🌟असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे🌟 छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव मुगल काळात रत्नपूर होते परंतु औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद असे केले तर देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचे देखील नामांतर होणार आहे असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. शिरसाट म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले. नगरचे नाव बदलले गेले. ह…
🌟संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष निकालाकडे🌟 मुंबई : - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांपूर्वीच पार पडल्या आहेत. इयत्ता १० वीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाली होती आणि मार्चमध्ये सर्व पेपर पूर्ण झाले आता संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आगामी मे महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती परंतु यंदा दहावीचा निकाल १५ मे २०२५ पूर्व…
🌟वंचित बहुजन आघाडी परभणी व भारतीय बोध्द महासभेच्या वतीने आयोजित स्वाक्षरी मोहीमेला उस्फुर्त प्रतिसाद🌟 ( महाविहार मुक्ती आंदोलनांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहीमेत स्वाक्षरी करतांना धाडसी युवा नेतृत्व समाजसेवी राज नारायनकर ) पुर्णा : - पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सोमवार दि.०७ एप्रिल रोजी परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडी व भारतीय बोध्द महासभेच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनांतर्गत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा अध्यक्ष सुनील …
🌟रिझर्व्ह बँकेचे बुधवारी पतधोरण रेपो दरात २५ बेसिस पॉइंटने कपात🌟 मुंबई : रिझर्व्ह बँक इंडियाकडून बुधवार दि.०९ एप्रिल २०२५ जाहीर होणाऱ्या पतधोरणात प्रमुख व्याजदरात पुन्हा पाव टक्का (२५ बेसिस पॉइंट) पर्यंत कपात करण्याची शक्यता आहे. महागाई दरात घसरण झाल्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या सध्याच्या उदार आर्थिक धोरणास पाठबळ मिळत असून अर्थढीला चालना देणे ही तातडीची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेने लादलेले आयात शुल्क जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभे करत असताना दर कपातीची आवश्यकता मांडली जात आहे. फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीन…
🌟कंत्राटदार महासंघाची टोकाची भूमिका : १५ एप्रिल रोजी घेणार कठोर निर्णय : कंत्राटदारांनी ५ फेब्रुवारीपासून छेडले कामबंद आंदोलन🌟 मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध शासकीय विभागांतर्गत विकास कामे मार्गी लावणाऱ्या शासकीय कंत्राटदारांची जवळपास ९० हजार कोटींची बिल शासनाने थकवली आहेत. बिलाची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी मागील ०५ फेब्रुवारी २०२५ पासून काम बंद आंदोलन छेडले आहे. मात्र बिलाची थकीत रक्कम देण्यासाठी राज्य सरकार वेळकाढूपणा करीत आहेत. त्यामुळे यापुढेही काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व रा…
🌟किसान एकता महासंघाची तहसिलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी🌟 परभणी (दि,07 एप्रिल 2025) - परभणी जिल्ह्यात अचानकपणे आलेल्या वादळी वारे व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन पालमचे तहसीलदार यांना आज सोमवार दि.07 एप्रिल 2025 रोजी निवेदन देण्यात आले. दि 03.04.2025 रोजी परभणी जिल्ह्यात सर्वत्र दि.03 एप्रिल 2025 रोजी अचानकपणे आलेल्या वादळी वारे व अवकाळी पाऊस काही प्रमाणात गारपीट यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्य…
🌟कारण १५० रुपयें रोजंदारीसाठी त्या ७ महिला कामगारांना आपला जीव गमावावा लागला🌟 परखड सत्य लेखक :- दिपक पुर्णेकर दि. ४ एप्रिलची ती बकासुरी सकाळ. वेळ सकाळचे साधारणता ७ वाजले होते. एक ट्रॅक्टर ज्यामध्ये एकूण ११ जण कामगार पैकी ९ स्त्रिया तर २ पुरुष कामगार होते. हे ट्रॅक्टर त्या ११ जणांना घेऊन भुईमूग निंदनासाठी शेतात घेऊन जातांना ड्रायव्हरचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने अख्खा ट्रॅक्टरच चक्क विहिरीत कोळसला. ड्रायव्हरने चालत्या ट्रॅक्टर मधुन उडी घेत पळ काढला. अन् काय क्षणात होत्याच नव्हतं झालं. कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची मावशी, तर कुणाची पत्नी त्य…
🌟मौजे शिरकळस येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते🌟 पुर्णा (दि.०७ एप्रिल २०२५) - भविष्यात मानवी जीवनासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक असून त्याचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड.नितीन भोसले यांनी केले येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या स्थानिकांसाठी कार्यक्रम या उपक्रमांतर्गत मौजे शिरकळस येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. महाविद्यालयाच्या स्थानिकांसाठी कार्यक्रम या उपक्रमांतर्गत गावकऱ्यांसाठी पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन…
🌟महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भू-प्रमाण ऑनालाईन सेवेचे केले उद्घाटन🌟 नागपूर : - भूमी-अभिलेख विभागाच्या सर्व सेवा भू-प्रमाण केंद्रामार्फत आजपासून ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल शनिवार दि.०४ एप्रिल २०२५ रोजी ३० भू-प्रमाण ऑनलाईन सेवेचे उद्घाटन केले. राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नगर भूमापन अधिकारी वर्ग १ कार्यालयात हा कार्यक्रम जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख भूषण मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. भू-प्रमाण केंद्राच्या ऑनलाईन सुविधांमध्ये नागरिकांकरि…
🏠प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थीना मिळणार ५० हजार रुपये वाढीव अनुदान🏠 मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थीना ५० हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या एक लाख २० हजार रुपयांच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत १०…