💥तीवरे गावात ज्यांची घरं पडली त्यांची घरे पुन्हा नव्याने बांधून देणार💥
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळुण तालुक्यातील तीवरे धरण फटून तीवरे गावातील अनेक घरं दूर्घटनाग्रस्तं झाली. अनेकांचे संसार उघ्वस्त झाले. आता याच गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेल्यांचे संसार सिद्धीविनायक मंदिर न्यास उभारणार आहे. तीवरे गावात ज्यांची घरं पडली त्यांची घरे पुन्हा नव्याने बांधून देणार येणार आहेत. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिध्दीविनायक मंदिर न्यासने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयाविषयी न्यासचे आदेश बांदेकर यांनी माहिती देताना तीवरे गावातील घरे बांधून देण्यासोबतच गावातील शाळा देखील सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करून सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, त्यामुळे धरण फूटीने आभाळ कोसळलेल्या तीवरे ग्रामस्थांना आयुष्याची नवी सुरवात करण्यासाठी. सिद्धीविनायकाने जणू आशिर्वादचं दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली...
0 टिप्पण्या