💥कोणत्याही क्षणी जायवाडी धरणातील मृतसाठा जिवंत पाणीसाठ्यात पोहोचण्याची शक्यता💥
✍ मोहन चौकेकर
औरंगाबाद :- नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गानंतर आज (ता. ३१) दुपारनंतर कोणत्याही क्षणी जायवाडी धरणातील मृतसाठा जिवंत पाणीसाठ्यात पोहोचण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. ३०) रात्री दहा वाजताच्या सुमारास जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा वजा ३.६४ इतका होता. आज (बुधवारी) सकाळी ७ वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात उर्दू भागातील प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गामुळे ४२ हजार ४६९ क्यूसेक पाण्याची आवक सुरू होती. आता केवळ १.८५ टक्केच पाण्याची धरणात आवक होताच धरणसाठा ‘प्लस’मध्ये जाणार आहे.
जायकवाडीचा एकूण पाणीसाठा ६९७.८५३ दलघमी अर्थात २४.६४ टीएमसी वर आज पोहोचला आहे, १०२ टीएमसी क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्याची क्षमता २६ टीएमसी इतकी आहे. नांदूर मधमेश्वर (जि. नाशिक) प्रकल्पातून प्रकल्पातून मंगळवारी सुरू असलेला ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग बुधवारी दुपारनंतर आपला परिणाम दाखवण्याची शक्यता आहे. सातच्या सुमारास ४२ हजार ६६९ क्यूसेकने सुरू असलेला पाण्याची आवक वाढेल, ५० ते ५५ हजार क्यूसेकवर जाण्याची शक्यता आहे...
✍ मोहन चौकेकर
1 टिप्पण्या
Thanks
उत्तर द्याहटवा