💥गेल्या ६ वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिसरात झाडे लावून त्यांची जिवापाड जोपासना केली💥
पूर्णेहून जवळच असलेल्या रिधुरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्यांनी मोठ्या परिश्रमातून गेले सहा वर्षे विविध झाडांना जोपासत शाळेभोवती गर्द वनराई उभी केलीय आज त्या झाडांचा सहावा वाढदिवस सुद्धा अनोख्या पद्धतीने साजरा केलाय एरवी जिल्हा परिषदेच्या शाळा म्हंटलं की बरेचजण नाक मुरडतात परंतु या शाळांतून सुद्धा मोठी राष्ट्रीय कार्ये जीव ओतून पूर्ण केली जातात .जिथे सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो तिथे झाडे लावा आणि ती जोपासा यासाठी पाणी कुठून आणणार.
परंतु दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही काहीही सिद्ध करून दाखवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण या खेड्यातील शाळेने व येथील विद्यार्थ्यांनी पेश केलंय.
गेल्या सहा वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिसरात झाडे लावण्याचा निश्चय केला तर एव्हढयावरच न थांबता त्यांनी नर्सरीतून विविध प्रकारची झाडे आणून ती लावली देखील आता प्रश्न होता झाडांना पाणी आणायचं कोठून ...
मग गावतील दोन किलोमीटर वरील शेतातून विद्यार्थी आणि शिक्षकांनी पाणी आणून ही झाडे जोपासली आणि दरवर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले ..
आज 21 जुलै रोजी हिरवीगार गर्द सावली असलेल्या झाडांचा वाढदिवस विद्यार्त्यांनी झाडांना फुगे बांधून,सर्व झाडांचे औक्षण करून साजरा केलाय .
त्यातच ह्या झाडांना विद्यार्थ्यांनी राख्याही बांधल्यात तर या झाडांना वाढदिवसाच्या उत्साहात शुभेच्छा ही दिल्यात आणि चॉकलेट सुद्धा वाटलेत
यावेळी शाळेचे मुख्यध्यापक मारुती रणवीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या...
0 टिप्पण्या