💥विवाह सोहळा समाजाला एक प्रेरणादायी नवी दिशा दर्शविणारा व वृक्ष संवर्धनाचा अमूल्य संदेश देणारा ठरला💥
✍ मोहन चौकेकर
चिखली: लग्न म्हणजे वधू वरांच्या आयुष्यातील अविसमरनिय क्षण त्यांनी केलेल्या नवीन आयुष्याची नवी सुरवात दोन अनोळखी मनाची रेशीमगाठ दोन मनानी, दोन हृदयांची आयुष्यभरासाठी साथ गोड स्वप्न घेऊन नवीन आयुष्याची केलेली सुरवात असेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे दि.10 जुलै रोजी चिंचोले परिवारातील मालगनी येथील अक्षय व निकस परिवार सावत्रा येथील दीपाली यांच्या झालेल्या विवाहसोहळ्यात वधू वराकडील मंडळींनी तोरणदारी भाषण बंदी व सत्कार समारंभ न ठेवता व वधू वरांच्या हाताने वृक्षरोपण करून हा विवाह सोहळा समाजाला एक प्रेरणादायी नवी दिशा दर्शविणारा व वृक्ष संवर्धनाचा अमूल्य संदेश देणारा ठरला.
अलीकडे समाजात लग्न म्हटलं की पुढाऱ्यांची मोठमोठी भाषणे व तासंतास चालणारे सत्कार सोहळे या दिवसेंदिवस वाढत्या चुकीच्या पायंडयाला तिलांजली देऊन समाजापुढे एक प्रेरणादायी वेगळी दिशा देण्याच काम या दोन्ही परिवाराकडून करण्यात आलं.
चिरंजीव अक्षय हे मालगनी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.तेजराव चिंचोले यांचे सुपुत्र व चिरंजीव सौ. कांशींनी दीपाली ही सावत्रा येथील सदन शेतकरी श्री.अरुण निकस यांची सुपुत्री यांच्या विवाह प्रसंगी समाजाला एक वेगळी दिशा देणारी तोरणदारी भाषण बंदी,सत्कार बंदी व वृक्षवरोपन करून वृक्षसंवर्धनाचा संदेश यावेळी चिंचोले व निकस दाम्पत्याकडून देण्यात आला,यावेळी उपस्थित वर्हाडी मंडळींनी भाषणबाजी व सत्कार समारंभ यामुळे लग्नाला होणारा विलंब टाळता आल्याने समाधान व्यक्त केलं,भाषणबाजी व सत्कार सोहळ्यामुळे लग्नाचा मुहूर्त टळून तासंतास लग्नाला उशीर होत असल्याने इच्छ असूनही लग्न न लावता बरीच नातलग मंडळी वधू वरांना भेटून परत जाताना आपण बघतच असतो तरी या लग्न सोहळ्यात सामान्य वरहाडांच्या भावनांची व त्यांना लांबच्या प्रवासात होणाऱ्या विलंबामुळे येणाऱ्या अडचणींचा विचार करून लग्न समारंभात भाषण बंदी व सत्कार सोहळे बंद ठेऊन दोन्ही परिवाराकडून प्रत्यक्ष रित्या कृतीत उतरवून मुहूर्तावरच लग्न लावण्याचा मोलाचा अनमोल असा संदेश या निमित्ताने समाजापुढे ठेवण्यात आला...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या