💥दंगलीतील आरोपींच्या अटकेसाठी चार पथके स्थापन,चारशें जनांवर गुन्हे दाखल💥
परभणी/जिल्ह्यातील पालम येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणात जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी अत्यंत कठोर भुमिका घेतली असून दंगल व जाळपोळ प्रकरातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तब्बल चार पथके स्थापण केली असून कायदा व सुव्यस्था बिघडविणाऱ्यांची यापुढे कसलीच गय केली जाणार नाही असे संकेत दिले आहेत. पोलिस प्रशासनाने काल शुक्रवारपर्यंत १४ जणांना ताब्यात घेतले असून आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेच्या भीतीने शहरातील अनेक दंगलखोर भूमिगत झाले आहेत.पालम येथे १७ जुलै २०१९ रोजी दोन गटांतील मारामारीच्या घटने नंतर दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणात व्यापार पेठेतील दुकानांची तसेच दुचाकी वाहणांची जाळपोळ करीत दगडफेक केली होती.
परभणी जिह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सरकारी वाहन पोलीस जीप व पेठपिंपळगाव चौक भागातील हॉटेल,पानटपरी, हातगाडे, दुकाने व दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोडतोड जाळपोळ करण्यात आली.पोलिसांनी जवळपास ४०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी गुरुवारी व शुक्रवारी १४ जणांना अटक केली.आरोपींच्या अटकेसाठी चार पथके स्थापन केली आहेत पालम शहरातील दंगल अवघ्या काही तासात आटोक्यात आणण्यात जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी अत्यंत मोलाची भुमिका बजावत तात्काळ फोर्स पाठवल्यामुळे मोठा अनर्थ टळला...
0 टिप्पण्या