💥सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी💥
मंगरुळपीर : अनुसुचित जाती आणी अनुसुचित जमातीमधील विद्यार्थ्यांना शासनाने विमा कवच उपलब्ध करुन देण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
अनुसुचित जातींच्या मुलांमुलीसाठी असलेल्या शाळा तसेच आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित शाळा अशा विविध योजनांतर्गत लाखो अनुसुचित जाती आणी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने शासनाने पावले ऊचलुन ऊपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अनूसुचित जाती तसेच आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आरोग्य व जीवन विमा कवच कशा पध्दतीने देता येईल याबाबत शासनस्तरावर कायदा करावा.
सद्य परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान मदत म्हणून दिली जाते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येतात. अपघाती कारणास्तव विद्यार्थ्यांचा मृत्यू ओढवतो अशा वेळी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य म्हणून विमा कवच असणे आवश्यक आहे. राज्य शासनामार्फत समाजातील इतर घटकांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याबाबत विविध योजना उपलब्ध आहेत त्या धर्तीवर अनुसुचित जाती व आदिवासी विद्यार्थ्यांनादेखील विमा कवच आवश्यक असल्याने त्यांना विमा सरंक्षण द्यावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
0 टिप्पण्या