💥पाणीपुरवठा योजनेच्या लाखो रुपयांच्या शासकीय निधीची धुळधान,तरीही ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती💥
पुर्णा/तालुक्यातील पुर्णा-नांदेड महामार्गावर तब्बल पाच ते साडेपाच हजार लोकवस्ती असलेल्या मौ.गौर गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने गौर ग्रामपंचायती साठी मागील सात ते आठ वर्षाच्या कालावधीत ८० ते ९० लाख रुपयांचा निधी प्राप्त करुन दिला विविध योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या लाखो रुपयांच्या निधीतून पाणी पुरवठा योजनेसाठी योग्य पध्दतीने पाणी पुरवठा पाईपलाईन अंथरूण पाण्याच्या टाकीस जोडण्यात आली असती तर कदाचित गौर ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता परंतु सदरील लाखों रुपयांच्या निधीची ग्रामपंचायत प्रशासनाने कागदोपत्री विल्हेवाट लावल्याने आज ग्रामस्थांना डोळ्यात तेल ओटून रात्र रात्रभर जागून ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील बारवात सोडलेल्या पाण्याच्या साठ्यातून चार दोन हंडे पाणी मिळवण्यासाठी आपला जिव अक्षरशः धोक्यात घालावा लागत असून गावातील अबाल वृध्द महिलांना सुध्दा रात्री दोन ते तिन वाजेच्या सुमारास मोडकळीस आलेल्या बारवात उतरुन पाणी न्यावे लागत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच
आज मंगळवार दि.१६ जुलै २०१९ रोजी रात्री ०२-०० वाजेच्या सुमारास गावातील बारवावर हंडाभर पाणी मिळवण्यासाठी गेलेल्या मन्मथ सोमनाथआप्पा नागठाने वय ३० वर्षे या युवकाचा पाय घसरुन तो अक्षरशः घसरत बारवात कोसळला त्याला बराच मुक्का मार लागला असून अंगावर भयंकर जख्मा झाल्या आहेत सुदैवाने मन्मथ यांचा प्राण बचावला असला तरी कदाचित त्यांच्या जागेवर एखादी वयोवृध्द व्यक्ती किंवा महिला असती तर अनर्थ झाला असता ग्रामस्थांना पिण्याची तहान भागविण्यासाठी अक्षरशः आपले प्राण तळ हातावर घेऊन बारवात उतरावे लागत असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.गौर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असतांनाही गौर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कैलास देसाई व सरपंच पारवे हे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलतांना मात्र दिसत नसून उलट मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पिण्याचे पाणी घरपोच वेळेवर मिळत नसतांनाही ग्रामपंचायत प्रशासन मात्र नागरिकांकडून पाणी पट्टी मात्र सातत्याने वसून करीत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे....
0 टिप्पण्या