💥शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक माहिती💥
1) एकरी 6 ते 10 कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) लावा. पण लक्षात असुद्या हा उपाय फक्त आपल्या शेतात बोन्ड अळीचा पतंग आहे कि नाही हे माहिती होण्यासाठी सावधगिरीचा उपाय आहे. तरी यात जितके पतंग अडकतील तितके कमी मिलन होईल पतंगांचे व अंडी घालण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल. ट्रॅप लावतांना ट्रॅप ची उंची हि पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 फूट उंच असावी
2) दुसरा उपाय म्हणजे 2 ते 3 एकर क्षेत्रासाठी लाईट ट्रॅप लावणे. या संदर्भात अनेक विडिओ व्हायरल होत आहेत त्या बद्दल थोडक्यात माहिती म्हणजे 1000 वॉट चा पिवळा हॅलोजन कांडी बल्ब घेऊन तो तेलाचा लोखंडी डब्बा घेऊन एक बाजूला आडवा फोडून व तेलाच्या डब्याला पिवळा रंग देऊन आतील बाजूला बल्ब लावणे. लाईट ट्रॅप लावतांना बल्ब चा प्रकाश झोत पिकावर पडेल त्याच बरोबर ट्रॅप ची उंची हि पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 फूट उंच असावी हि खबरदारी घेणे गरजेचे आहे. *त्याच बरोबर बल्ब ला वायरिंग करतांना योग्य इन्सुलेशन होईल व त्याच बरोबर कोणाला शॉक लागणार नाही किंवा पाणी पडल्यास खाली करंट उतरणार नाही जेणे करून कोणती हि जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेणे खूप गरजेचे आहे.*
वरील पिवळ्या लाईट ट्रॅप कडे पतंग रात्रीच्यावेळी आकर्षित होऊन बल्ब मुळे निर्माण झालेल्या उष्णतेने मरण पावतील.
3) वरील दोन्ही उपाय करून पण काही पतंग सुटलेच व त्यांचे मिलन होऊन त्यांच्या मादी पतंगाने अंडी घालण्याचा प्रयत्न केल्यास अंडी घालायला पोषक वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पात लागायला सुरवात झाल्यापासून फुल उघडे असतांना व त्या नंतर कोवळे बोन्ड तयार होईपर्यंत दर 7 दिवसांनी 1 वेळेस अत्यंत कडू औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे. (बोन्ड अळीच्या पतंगांना व त्यांच्या अळीला अनेक रासायनिक औषधांना प्रतिकार शक्ती तयार झाली आहे) ज्यामुळे एक तर अत्यंत कडवटपणामुळे अंडी घालण्यासाठी व अंडी घातल्या नंतर अंड्यातून बाहेर येणाऱ्या अळीला राहण्यासाठी फुलामध्ये पोषक वातावरण राहणार नाही त्यामुळे ती फुलांमधून बाहेर पडेल. असा कडवट स्प्रे हा फुल उघडे असतांना बोन्डात रूपांतर होण्यापूर्वी 2 वेळेस होणे गरजेचे आहे त्याच बरोबर स्प्रे करतांना औषधाचा मुख्य रोख हा फुल व पाती कडे असावा.
असे लिंबोळी अर्क 5% व 20% चा फवारा पिकावर करावा, जेणेकरून अळीचा अटकाव होईल, असे 20% लिंबोळी अर्क आता अमिनो ऍसिड आणि फुलविक ऍसिड सोबत बाजारात उपलब्ध आहे.
आपण घरिच लिंबोळी अर्क किंवा कडू वनस्पतींचा अर्क तयार करून त्याचाही उपयोग करू शकतो.माझ्यामते येणाऱ्या 2 अमावस्येला किंवा त्यानंतर 1/2 दिवसांनी असा अर्क कापूस पिकावर फवारले तर फायद्याचे ठरेल.
तसेच स्टिकर चा उपयोग फक्त स्टिकर म्हणून न करता स्प्रेडर म्हणून करा प्रत्येक फवाऱ्यात 5/7 मिली करावा .साध्या स्टिकर पेक्षा पानांमद्ये पूर्ण पेनेट्रेट होणारे सिलिकॉन स्टिकर 7 मिली वापरावे. Apsa 80 उत्तम स्प्रेडर आहे, अगदी लो लेव्हलचे स्टिकर अजिबात वापरू नका अशा स्टिकर मुळे कापसाची पाने गळ तात.
0 टिप्पण्या