मंगरुळपीर- तालुक्यातील कोळंबी येथील साबीर मुसा फकिरावाले यांच्या गोठ्यात अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने गोठ्यातील 8 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यामध्ये दोन बैल,पाच गायी, आणि एक गोरा असे आठ जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळं आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच अडीच लाखाचे पशुधन गेल्यानं संकट आले आहे. शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या