💥निकृष्ठ दर्जाची कामे करुन रस्त्यांच्या बांधकामांचा निधी कागदोपत्री गिळकृत ? लोकप्रतिधींनी गाठला बेशरमीचा कळस💥
पुर्णा/तालीक्यात पावसाने जोर धरल्याने गाव खेड्यांना तालुक्याशी जोडणारे मुख्य रस्ते आता शेवटची घटीका मोजतांना पाहावयास मिळत असून अनेक गावातील मुख्य रस्त्यांचे रुपांतर पानधन रस्त्यांत झाल्याने अनेक गावांचा तालुक्याशी असलेला संबंध तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील महागाव,कावशी ते कानखेड-१,कानखेड-२,कान्हेंगाव,महागाव,निळा,बरबडी,लक्ष्मीनगर,फुकटगाव,खुजडा,हटकरवाडी,एकरुखा,कौडगाव,इस्लामपूर,आहेरवाडी,सुरवाडी,ममदापूर,गणपूर,सुकी,सुहागण,आव्हई,नरापूर ते लिखा पिंपळगाव,कंठेश्वर,गंगाजीबापू,कावलगाव,ढोणे पांगरा,सारंगी,वाणी पिंपळगाव,भोगाव,लोखंडे पिंपळा,खांबेगाव,आदीं गाव खेड्यांसह अनेक जिल्हा परिषद/पंचायत समिती सर्कल मधील गावांना जोडणारी जोडरस्ते अल्पशः वृष्टीमुळे लोकप्रतिधींच्या भ्रष्ट कारभाराची लख्तरे वेशीवर टांगतांना दिसत आहे.जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूकीत ग्रामीण भागातील मतदारांच्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसह पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या आ.मधुसूदन केंद्रे यांच्या अकार्यक्षम कारभाराचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य मतदारांना प्रत्यय येत आहे. अत्यंत दयनीय झालेल्या रस्त्यांमुळे,सदरील रस्ते गावांचे मुख्य रस्ते की पांधन रस्ते ? असा प्रश्न ग्रामीन भागातील जनते समोर निर्माण होत आहे.यातील अनेक गावांतील रस्ते अवघ्या काही वर्षांपूर्वीच झालेली आहेत तर काही रस्ते स्वतःच्या दुरुस्तीची मागील अनेक वर्षानूवर्षे वाट पाहत आहेत.तालुक्यात सहा जिल्हा परिषद सर्कल असून या सहा जिल्हा परिषद सर्कल मधील निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच विद्यमान आमदार डॉ.केंद्रे हे ग्रामीण भागातील जनतेच्या आवश्यक नागरी सुविधा उदा.रस्ते-पाणी-विज आदी सुविधा पुरविण्यात संपुर्णतः अपयशी ठरल्याचे दिसत असून ग्रामीण भागातील जनता नागरी सुविधां अभावी त्रस्त झाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत याचा परिणाम लोकप्रतिनिधींना भोगावाच लागेल यात तिळमात्र शंका नाही....
0 टिप्पण्या