💥शोषित वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचागौरव सोहळा व शालेय साहित्याचे वाटप💥
✍ मोहन चौकेकर
💥कष्टकऱ्यांचा भव्य मेळावा मोठया उत्सहात संपन्न💥
चिखली/लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे अनुभवले त्याचे प्रतिबींब त्यांच्या जगप्रसिध्दं साहित्याच्या माध्यमातून कथा , कादंबऱ्यांमध्ये उमटवले आहे. त्यांच्या कार्याची दखल संपुर्ण जगाने घेतली असून समाजाने त्यांचा आदर्श आत्मसात करुन घेण्याची गरज आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्यं सुरेशअप्पा खबुतरे यांनी काढले. चिखली येथील पंचायत समिती सभागृहात दि 4 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमीत्तं शोषित वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचागौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप तसेचकष्टकऱ्यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
खबुतरे पुढे म्हणाले की , अण्णाभाऊ साठे यांनी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मोठा लढा उभारुन पोवाडे , कलापथकाव्दारे संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक छोटु कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी उद्घाटक दैनिक आम्ही चिखलीकरचे कार्यकारीसंपादक तथा विधीज्ञ जिल्हा सत्र न्यायालयबुलढाणा ॲड. गुणवंत नाटेकर होते. आहे.प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायधीश सुरेशघोरपडे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये चिखली कृषी बाजार समिती संचालककाशीनाथ आप्पा बोंद्रे , भाजपा नेते डॉ.प्रतापसिंग राजपूत , कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालक गजानन पवार ,वंचितआघाडीचे नेते भाईजान उबेद अली खान,हाजी निसार सेठ ,राष्ट्रवादी ओबीसी सेलचेजिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे ,रयतक्रांतीचेविदर्भअध्यक्ष प्रशांत ढोरे , जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक,संतोष काळे, वकील संघाचेअध्यक्ष ॲड. सलीम शेख ,नगरसेवक सुदर्शनखरात ,राजेशजी चांडक ,युवा स्वाभिमानशहराध्यक्ष पवन चव्हाण , समतादूत मोहसीनखान , एल.के.मानवतकर, यांच्यासह अनेकमान्यवरांची उपस्थिती लाभले असून विशेषउपस्थिती म्हणून समाजातील गणमान्य मोठया संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचेसूत्रसंचालन गणेश धुंदळे तर आभार भाई छोटु कांबळे यानी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वला फाऊंडेशच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा कांबळे, दिलीप काळे, आकाश डोणगांवकर, राज नेमाडे, अनिल तायडे, नितीन गायकवाड, सुभाष कांबळे, सचिन कांबळे, मधुकर वायसे,दिनकर पारधे,रामेश्वर घाडगे, अमर वायसे, आप्पा पारधे, अजय बोके, मोहन तायडे, सागर गायकवाड, चेतन घाडगे,सतीश काळे, संदीप बोके, अरुण पवार, मनोज साळवे ,योगेश साळवे, यांनी अथक परिश्रम घेतले...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या