💥ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार मान्यवरांचा गौरव💥
--------------------------------------------------------
💥कार्यक्रमास भाविक,नागरिकांनी उपस्थित राहावे-राजेश गित्ते
-----------------------------------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- वै.प्रा.हरिश्चंद्र पंडितराव गित्ते (सर) यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त गित्ते परिवाराच्या वतीने दि.29 जुलै पासुन बेलंबा येथे सुरु असलेल्या ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांची शिवलीलामृत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची आज दि.04 ऑगस्ट रोजी सांगता होणार असुन आज सन्मान कर्तृत्वाचा या सामाजिक कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्यकरणार्या समाजबांधवांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा व सन्मान कर्तृत्वाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते राजेश गित्ते व गित्ते परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
वै.प्रा.हरिश्चंद्र पंडितराव गित्ते (सर) यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त गित्ते परिवाराच्या वतीने बेलंबा सारख्या ग्रामिण भागात सामाजिक उपक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या वाणीतुन शिवलीलामृत कथा भाविकांना ऐकावयास मिळाली. आज दि.04 ऑगस्ट रोजी ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात नारायण कराड (उपसचिव गृहविभाग, मंत्रालय मुंबई), डॉ.बापु पवार (आयुक्त, एमएमआरडीसीए,मंबई), सौ.लताताई फड (एस.पी.सीआयडी, औरंगाबाद ब्रँच), दिल्लीप गुट्टे (अप्पर जिल्हाधिकारी, सिडको मुंबई), महादेव किरवले (उपजिल्हाधिकारी, परभणी), बाळासाहेब दौडतले (अध्यक्ष ः शेळीमेंढी, महामंडळ, महाराष्ट्र), राजेभाऊ शिंदे (उद्योजक, पुणे), ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री मुंडे (युवा किर्तनकार, टोकवाडी), बालासाहेब कडबाणे (संपादक ः दै.जगमित्र तथा अध्यक्ष ः परळी पत्रकार संघ, परळी वैजनाथ) या सामान्यातील, असमान्य व्यक्तिमत्व ज्यांती सामाजिक तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्यकरुन समाजमनात एक चांगले नावलौकिक मिळवुन समाजापुढे आदर्श निर्माण केलेल्या कर्तृत्वान व्यक्तिंचा हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मंडे यांच्या हस्ते व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दि.04 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खा.प्रताप पाटील चिखलीकर, खा.संजय जाधव, प.पू.गुरुवर्य रामरावजी ढोक महाराज, आ.सुरेश धस, आ.आर.टी.देशमुख, आ.भिमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.संगिता ठोंबरे, माजी आ. गोविंद केंद्रे, जि.प.अध्यक्ष सविता गोल्हेर, अंबाजोगाई कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक दत्ता ढमाळ, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जि.प.समाजकल्याण सभापती संतोष हंगे, उपाध्यक्ष जयश्री मस्के, बांधकाम सभापती युध्दजीत पंडित, महिला व बालकल्याण सभापती शोभा दरेकर, तिरुपती कन्स्ट्रक्शनचे केशव आघाव, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, तहसिलदार विपिन पाटील, सोनपेठचे तहसिलदार जिवराज डापकर, गटविकास अधिकारी वैजनाथ जी.लोंखडे, सांगळे अॅग्रो फुडचे प्रा.अनिल सांगळे यांची उपस्थितीत राहणार आहेत. आजच्या सांगता समारोह व सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमास परिसरातील भाविक, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते, धनंजय गित्ते, अजय गित्ते, बलभीम गित्ते व गित्ते परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
*************
गित्ते परिवारा तर्फे 400 रोपट्यांचे वाटप
या अखंड हरिनाम सप्ताहा निमित्त आज दि.04 ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन केले असुन काल्याचे कीर्तन व महाप्रसादास उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना वृक्षांचे रोपटे भेट देऊन वृक्षलागवड चळवळीस बळकटी देण्यात येणार आहे. गित्ते परिवाराच्या धार्मिक कार्याबरोबरच या सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आल्याने हे वृक्ष वाटप या अखंड हरिनाम सप्ताहाचे आकर्षण ठरणार आहे.
0 टिप्पण्या