🔹औषधी,कपडयांसह जिवनावश्यक वस्तू जमा 🔹
गंगाखेड :
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी आज गंगाखेड शहरातील हजारो हात पुढे आले. विविध सामाजीक संस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या मदत फेरीतून लाखाच्या वर रोकड आणि औषधी, कपडयांसह जिवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. ही मदत थेट सांगलीत नेवून वाटप केली जाणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
कोल्हापूर - सांगली भागात पुराने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. अजूनही अनेक गावांना पुराचा वेढा असून या भागातील रहिवाशांना सर्वच प्रकारच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. यात प्रामुख्याने औषधी, कपडे व खाद्य पदार्थांची कमतरता भासत आहे. ही मदत जमा करण्यासाठी गंगाखेड शहरातील मानव मुक्ती मिशन,श्री साई सेवा प्रतीष्ठाण, सवंगडी कट्टा, व्यापारी महासंघ, माजी सैनिक संघटना, पेन्शनर संघ, पद्मश्री.डाॅ.वि.विखे पाटील कृषी परीषद, लॉयन्स क्लब जनाई, लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन, जमिएत ए ऊलमा ए हिंद, रजा ॲकॅडमी आदि सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून मदत फेरी काढण्यात आली. गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या प्रमुख ऊपस्थितीत पूरातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून फेरीस शिवाजी चौकातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी सवंगडी कट्टा समुहाच्या वतीने सर्वाधीक भरीव मदत करण्यात आली. यात औषधी व ईतर जिवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तर महिला सवंगड्यांकडून महिलांसाठी सॅनीटरी पॅड व ईतर साहित्य देण्यात आले. तसेच मुस्लीम बांधवांच्या ईद सोहळ्यातील नामाज स्थळावरून हजारो रूपये जमा करण्यात आले. शहरातील सर्वच व्यापारी बांधवांनी रोख व वस्तूंच्या माध्यमातून देणग्या देत आपली दानशूर वृत्ती दाखवून दिली. आजच सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ऊपस्थितीत हा निधी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना सुपूर्द करण्यात आला. तर जमा झालेले साहित्य थेट पूरग्रस्त भागात पाठवले जाणार आहे.
साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, मानव मुक्ती मिशनचे ओंकार पवार, धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे, लॉयन्स क्लबचे प्रा. मुंजाजी चोरघडे, संतोष तापडिया, अतुल तुपकर, गजानन महाजन, सवंगडी समुहाचे रमेश औसेकर, प्रकाश घण, मनोज नाव्हेकर, कारभारी निरस, व्यापारी महासंघाचे दगडूसेठ सोमाणी, पेन्शनर संघाचे बाबुराव गळाकाटू, माजी सैनिक संघटनेचे विश्वनाथ सातपुते, संपतराव निरस, डॉ गोविॅद मुळे, सिद्धार्थ भालेराव, मुंजाभाऊ लांडे, प्रभाकर सातपुते, सुहास पाठक, केशव देशमुख, शंकरराव मोरे, संजय अनावडे, नागेश पैठणकर, शेख खालेद मौलाना,
ॲड सय्यद अकबर, कलीम भाई, ईरफान भाई, ईस्माईल,शेख खालेद भाई, चांद भाई टेलर,राजु खान, फेरोज खान ,जफर खान, शब्बीर भाई, नरेंद्र भालेराव, नागेश कोनार्डे, माया औसेकर, श्रद्धा बोरफळे, वर्षा यादव, माधुरी राजेंद्र, सुर्यमाला मोतीपवळे, रेणू घण, सीमा घनवटे, मंगल बोडखे, रेघाटे काकू, सोनवणे भाभी, आदिंसह विविध सामाजीक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पूरग्रस्त भागात ईतरही मदतीची गरज असून देण्यासाठी अथवा सांगली भागात मदत कार्यात सहभागी होवू ईच्छीणारांनी भ्रमणध्वनी क्रमांक *9421541111, 800758 0516, 095119 22000* यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या