💥महागात वस्तू विक्री करणाऱ्यां विरोधात १०७७ आणि २६५५४१६ या क्रमांकांवर तक्रार नोंदवता येईल💥
कोल्हापूर जिह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा गैरफायदा घेत जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अशा प्रकारे जर कोणी महागात वस्तू विकत असेल तर त्याची १०७७ आणि २६५५४१६ या क्रमांकांवर तक्रार नोंदवता येईल, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.
पुरामुळे वाहतुकीसह संपूर्ण जनजीवनच ठप्प झाल्याने कोल्हापूर शहरात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्येभाज्यांचे दर कडाडले आहेत. वांग्याचा इथला दर २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मार्केट यार्डमध्येच जर इतका दर असेल तर तो किरकोळ भाजी विक्रेत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर २५० ते ३०० रुपये इतका होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे सर्वच भाज्यांचे जर कडाडले आहेत. त्यामुळे आस्मानी संकटाने झोडपलेल्या कोल्हापूरकरांचे आता या महागाईने कंबरडे मोडले आहे.
0 टिप्पण्या