💥गृहमंत्री अमित शहांचा ऐतिहासिक निर्णय,काश्मीरी पंडीतांनी साजरा केला स्वातंत्र्याचा जल्लोश💥
जम्मू कश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण असल्याने केंद्र सरकारने उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू कश्मीरच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात हिंसाचाराची शक्यता असल्याने केंद्राकडून राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी पोलिसांनी मॉक ड्रिल घ्याव्यात अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
जम्मू कश्मीरमधील तणावाची परिस्थिती लक्षात घेता तेथे निमलष्करी दलाच्या एक हजार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तेथे निमलष्करी दलाच्या एक लाख जवानांना तैनात करण्यात आले आहे. जम्मू कश्मीरमध्ये अशी सुरक्षा व्यवस्था पुलवामा हल्ला आणि हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर ठेवण्यात आली होती. कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्यानंतर निमलष्करी दलाच्या 100 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी कश्मीर खोऱ्यात 80 तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. तसेच अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या 320 तुकड्यांना कश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहे. कश्मीर खोऱ्यात सुरक्षेसाठी नियमितपणे निमलष्करी दलाच्या 450 तुकड्या तैनात असतात. सध्या कश्मीर खोऱ्यात एक हजार कंपन्या तैनात आहेत. जम्मू कश्मीरमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत
0 टिप्पण्या