💥जनअशिर्वाद यात्रेत अदित्य ठाकरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना खतांचे वाटप💥
परभणी-मानवत/शिवसेना पक्षाची नाळ थेट जनतेशी जोडलेली आहे निवडणुका येतात जातात विजय पराजय होत असतो.पण निवडणुका संपल्या तरी मधल्या काळात जनतेशी संवाद साधायचा असतो त्यांची कामे करावयाची असतात.म्हणूनच शिवसेना सत्तेत असुन ही जनतेच्या कामम साठी सरकार विरोधी भुमिका घेत आंदोलने करून प्रश्न सोडऊन घेते असे प्रतिपादन युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी 'जन अशिर्वाद यात्रेत' मानवत येथील नेहा मंगल कार्यालयात आयोजित विजय संकल्प मेळाव्यात शुक्रवार २ ऑगष्ट रोजी बोलतांना केले.
यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, मंत्री अर्जून खोतकर,युवासेनेचे सरदेसाई, सचिन अहिर, खा संजय जाधव, माजी आ मिराताई रेंगे, जिल्हा प्रमुख सुरेश ढगे युवासेना जिल्हाधिकारी दिपक बाराहाते, पाथरी विधानसभा मतदार संघातुन शिवसेने कडून निवडणूकी साठी इच्छूक असलेले डॉ राम शिंदे,मानवत तालुका प्रमुख विष्णू मांडे,पाथरी तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांच्या सह शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना आदित्य म्हणाले की, ही जन आशिर्वाद यात्रा म्हणजे माझ्या मते तिर्थयात्रा असून मी जनतेचे आशिर्वाद घ्यायला आलोय ज्यांनी आम्हाला मते दिली त्यांचे आभार मानायला आलोय आणि ज्यांनी मत दिली नाहीत त्यांची मनं जिंकण्या साठी आलोय. निवडणुका झाल्या आता मतभेद पण संपले पाहिजे मत भेद बाजुला ठेवत आता सर्वांची कामे केली पाहिजेत.
असे सांगत आपण जनतेचे सेवेकरी आहोत असेही ते म्हणाले. या वेळी मानवत तालुक्यातील आत्महात्या ग्रस्त शेतक-यांना शिवसेनेच्या वतीने डॉ राम शिंदे यांनी प्रत्येकी चार पोते खतांचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी चार ची असतांना हा कार्यक्रम रात्री सव्वा नऊ वाजता सुरू झाला.पोखर्णी वरुन पाथरी,मानवत असा हा ठाकरे यांचा दौरा होता मात्र रात्र पाऊस सुरू झाल्याने पाथरी दौरा रद्द करून रामेटाकळी मार्गे ठाकरे हे थेट मानवत येथे गेले.या कार्यक्रमा साठी पाच तास उशिर होऊन ही पाथरी,मानवत तालुक्यातील हजारो शेतकरी, शिवसैनिक कार्यक्रमा साठी नेहा मंगल कार्यालयात उपस्थित होते.
0 टिप्पण्या