💥परभणी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न चिन्ह ?💥
परभणी/जिल्ह्यात सर्वात जास्त प्रचलित झालेल्या 'जगात जर्मनी अन भारतात परभणी'आता निश्चितच थोडीशी सुधारणा करण्याची वेळ आली असून आता 'जगात जर्मणी अन् भारतात परभणी अन् परभणी जिल्ह्यात प्रत्येक अनैतिक कार्यात अग्रेसर पुर्णा'असे म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यातील पुर्णा तालुका अवैध देशी-विदेशी दारु तस्करी आणी अवैध दारु विक्रीत आघाडीवर असल्याचे पाहावयास मिळत असून या अवैध देशी-विदेशी दारु विक्रीला जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाभाचा 'ग्रिन सिग्नलच' असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा तालुक्यात मागील १७ फेब्रुवारी २०१८ ते १२ सप्टेंबर २०१९ या सतरा महिण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (इ) अंतर्गत तब्बल पन्नास गुन्ह्याची नोंद झाली आहे.संबंधित गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सखोल तपासाचान भाग म्हणून गुन्ह्यात आरोपीकडून जप्त झालेल्या देशी-विदेशी दारु साठ्याचा बॕच नंबर तपासण्याच्या दृष्टीकोनातून राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना रितसर पत्र देऊन गुन्ह्यातील दारु साठा बॕच नंबर अनुसार शहर परिसरातील कोणत्या अधिकृत परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्याचा दुकानातील आहे की अधिकृत बिअर बार चालकाकडील आहे याचा तपास करणे आवश्यक असते परंतु पोलीस प्रशासनाकडून किंवा राज्य उत्पादन विभागातील अधिकाऱ्यांकडून दाखल पन्नास गुन्ह्यात तसे झाल्याचे निदर्शनास येत नाही एकंदरीत संबंधित गुन्ह्यात अवैध देशी-विदेशी दारु विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यास वेळोवेळी वाचवण्याचाच प्रयत्न झाल्याचे पाहावयास मिळते पुर्णा शहरातील अत्यंत संवेदनाशील आणी दंगलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळकरोड परिसरातील रवी रतनलाल जैस्वाल वाईन शॉप तसेच वसंतलाल जैस्वाल देशी दारु दुकान,उच्चभ्रू वसाहत अर्थात डॉक्टर लाईन भागातील पुजा बिअर बार,याच भागातील जैन मंदिर समोरील अंबिका बिअर बार,विश्वरुपा बिअर बार,तर रेल्वे स्थानक समोर रोडवर श्रध्दा बिअर बार,अजमेरा यांची देशी दारु दुकान शहरातील कायदा व सुव्यस्थेला वेळोवेळी धोका निर्माण करीत असून परिसरातील नागरिक तसेच येणाऱ्या जाणाऱ्या महिला विद्यार्थी-विद्यार्थींच्या सुरक्षेला बाधक ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे संबंधित देशी-विदेशी दारु दुकानांसह बिअर बार हीं शहरा बाहेर स्थलांतरीत करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरीकांतून होतांना दिसत आहे..
0 टिप्पण्या