💥गोदावरी नदी तुडुंब वाहत असल्याने पुलावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहणांसह वाटसरुंच्या जिवीताला धोका💥
पुर्णा/तालुक्यातील मौ.धानोरा काळे परिसरातील गोदावरी नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षण कठडे तुटल्यामुळे या पुलावरुन वाहतूक करणाऱ्या वाहणांना प्रचंड धोका निर्माण झाला असून काल रात्री ०८-०० वाजेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ७० ते ८० फुट खोल असलेल्या गोदावरी नदीचे पाणी पुलाला टेकायला अवघे ५ राहिले असल्यामुळे सदरील पुल रहदारीस धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील संरक्षण कठड्याच्या झालेल्या मोडतोडीकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मौ.धानोरा परिसरातील गोदावरी नदीवरील पुलावर असलेल्या संरक्षण कठड्याच्या झालेल्या दुर्दैवी अवस्थे मुळे परिसरातून वाहतूक करणाऱ्या वाहण चालकांसह नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे..
💥चुडावा येथील जागृत नागरिक धनंजय देसाई यांच्या जागृकते मुळे आली घटना निदर्शनास..!
तालुक्यातील चुडावा येथील जागृत नागरिक धनंजयभाऊ देसाई यांना पालमला जाते वेळी सदरील गंभीर बाब निदर्शनास आली आणी त्यांनी समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे ही भावना मनात ठेवून तात्काळ धानोरा परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कठड्यांच्या झालेल्या मोडतोडीचे छायाचित्रन करुन वृत्तपत्रांना पाठवल्यामुळे वृत्तपत्र प्रतिनिधींनिही घटनेचे वृत्तांकन करुन ही गंभीर बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
एकंदर सर्वसामान्य नागरीकांनी ही आपली जागृकता आणी जवाबदारी ओळखून आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडायलाच हवे हे श्री.धनंजय देसाई यांनी दाखवून दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे....
0 टिप्पण्या