💥परभणी जिल्ह्यातील शिवसेच्या चिरेबंदी बांधणीसाठी पुढाकार घेतलेली सर्वसामान्य घरातील तरुणांची मोठी फळी समोर आली💥
💥लेखक ; विजय कुलकर्णी - नाही चिरा-नाही पणती
मराठी भाषिकांचा पाच जिल्ह्यांंचा प्रदेश म्हणुन नाव मराठवाडा. (याच पाच जिल्ह्यांचे नंतर आठ जिल्हे झाले.) याच मराठवाड्याने 1947 पर्यंत रझाकारांचे पाशवी अत्याचार सहन केले. त्याचा प्रतिकार केल्यानंतर स्वामी रामानंद तिर्थ आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या कृपेने नंतर मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला.
निजामाच्या काळापासुन मराठवाड्यातील परभणी जिल्हा हा मध्यवर्ती जिल्हा म्हणुन ओळखला जातो. निजामशाहीतील अनेक महत्वाची ठाणी, व्यापार केंद्रे परभणीत होती. तेंव्हापासुनच परभणीच्या पदरी संघर्ष आहे. एकेकाळी काँग्रेसचा बोलबाला असलेल्या या जिल्ह्यात शेकापने आपली पाळेमुळे रोवली. कालांतराने मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. त्याचे वारे परभणीतही वाहु लागले. शेकापच्या बालेकील्ल्यात शाखेच्या स्वरुपात शिवसेनेचा चंचुप्रवेश झाला. पण हा छोटासा प्रवासही अत्यंत दुर्गम आणि खडतर होता. यासाठी तत्कालिन पोलिस प्रशासनाचा काय रोष पत्करावा लागला, हे पाहील्यास यातली दाहकता समोर येते.
ज्वलंत हिंदूत्वाच्या विचारावर आणि निष्ठेवर वाढलेल्या शिवसेनेची आणि शिवसैनिकांची चित्तथरारक गाथा परभणीतील लेखक *सतिश सातोनकर* यांनी *गोफणगुंडा* या पुस्तकात मांडण्याचा प्रांजळ आणि निर्मळ प्रयत्न केला आहे. आ. बाळासाहेबांच्या विचारासाठी अनेक तरुणांनी घरादारावर व आयुष्यावर तुळशीपत्र ठेवली. आजही अनेकांची आयुष्ये या होमकुंडात करपलेली दिसुन येतात हे दुर्दैव. असंख्य पोलिस केसेस अंगावर घेऊन प्रसंगी प्राण देऊनही तत्कालिन शिवसैनिकांनी हा झंझावात पुढे नेला. ऊत्तर प्रदेशात ज्या मायावतींनी आत्ता आत्ता सोशल ईंजिनिअरींगचा प्रयोग करुन सत्ता हस्तगत केली. तो प्रयोग केवळ समाजकारणासाठी शिवसेनेने 80 ते 90 च्या दशकातच केला होता हे विशेष. तसे महाराष्ट्रात सत्तेच्या बाहेर राहुन सत्ताधिशांवर अंकुश ठेवणारे दोनच भक्कम दबावगट आजतागायत दिसुन येतात. त्यातली एक *शेतकरी संघटना* तर दुसरी *शिवसेना.* पण शिवसेनेला हे यशही सहजासहजी प्राप्त झालेले नाही, हे या पुस्तकात पदोपदी दिसुन येते. परभणीतील शिवसेच्या चिरेबंदी बांधणीसाठी पुढाकार घेतलेली सर्वसामान्य घरातील तरुणांची मोठी फळी समोर आली. प्रामुख्याने यातील *दामुआण्णा शेटे* व *सखारामपंत लोहगावकर* ही नावे वगळुन पुढे जाता येत नाही. परभणीचे भुमीपुत्र तथा माजी मंत्री *दिवाकर रावते* यांच्यासोबत ज्यांचा शिवसेना वाढवणे आणि रुजवण्यात मोठा वाटा होता. यासह अनेक तरुणांनी यासाठी संघर्ष केला आहे. आज जी सत्तेची फळे विद्यमान शिवसेनेला दिसतात, त्याला या धगधगत्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. तो संघर्ष या पुस्तकात मांडलेला दिसुन येतो. यातील अनेक नावे जी परिस्थितीमुळे काळाच्या पडद्याआड जात होती त्यांना ऊजाळा मिळाला आणि या सर्वसामान्य घरातील पोरं या पुस्तकरुपाने अमर झाली असे म्हणायला हरकत नाही.
कालांतराने घराघरात शिवसेना पोचल्याने ती सत्तेच्या प्रवाहात आली. शिर्षस्थ शिवसेना नेत्यांनी पाहीलेले स्वप्न आकाराला आले. 1980 च्या दशकापासुन आजपर्यंत घराघरात पोहचवलेल्या शिवसेनेच्या विचारांमुळे आजतागायत परभणीतील *भगवा* खाली आला नाही. हे शिवसेनेच्या तत्कालिन शिर्षस्थ नेत्यांचे यश आहे. विशेष म्हणजे सेनेने ज्यांना मोठे केले अशी अनेक माणसे सेनेला सोडुन गेली, पण सर्वसामान्य माणुस मात्र आजही शिवसेनेच्या पाठीशी भक्कम ऊभा असलेला दिसुन येतो.
तसे पहायला गेल्यास मागच्या दोन- तीन दशकात बरीचशी पडझड झाली. जुने जाणते मागे पडुन अनेक ठिकाणी नवे नेतृत्व ऊदयाला आले. त्यात जुना व निष्ठावान सैनिक मात्र पोटासाठी प्रवाहाच्या बाहेर गेला आहे. सत्तेच्या गालिचावर या शिवसैनिकांनी कधीच पाय ठेवलेला दिसला नाही. यादीच काढायची झाल्यास परभणी व हिंगोली जिल्ह्यात अशी नावे हजारांवर निघतील. सत्तेच्या गालिचावरील शिवसेनेचे चेहरे व निष्ठावान आणि कफल्लक शिवसैनिकाचा चेहरा सहजगत्या ओळखता येईल. या सर्वांचाच संघर्ष या पुस्तकरुपाने मांडण्यात आला आहे. यात अनेक नावे राहीलेली असु शकतात. लेखनमर्यादेमुळे मजकुरही कमी-जास्त असु शकतो. परंंतु *सतिश सातोनकर* यांची तळमळ, निस्वार्थ आणि समर्पित भाव ठळकपणे दिसुन येतो. म्हणुन ज्ञात-अज्ञात शिवसैनिकांची ही यशोगाथा आहे. असाच याचा ऊल्लेख करावा लागेल.
शेवटी एवढेच सांगता येईल...
*अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत*
*स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात*
*विजय कुलकर्णी*
*परभणी* dhanyvad aadarniy Mitra mahoday
1 टिप्पण्या
'गोफनगुंडा' हे पुस्तक खुपच छान आहे. वाचकांना मैत्रीपूर्ण शब्दांमध्ये माहिती उपलब्ध करून दिली आहे.
उत्तर द्याहटवा