💥लेखक - सतिश सातोनकर - हिंगोलीचे गडकरी ‘‘ राजे बांगर ’’💥
हिंगोलीचे वतनदार राजे बांगरांचा हा पाच मुंड विस्तार होय. यात वरची गढी तर पायथ्याला मडी त्यात न्याय निवाडा होत असे. पोळ्याचा मारोती हिंगोलीची मुळ ग्राम देवता. मुळ गावचे नाव वंजारवाडा. गांधी पुतळ्याच्या आलिकडे असलेले बाबाराव बांगर यांचे चुलते जयवंतराव बांगर नदी लगत आपल्या शेताकडे गवत कापण्यासाठी जात असतांना रस्त्यातच पट्टेदार ढाण्यावाघाने जयवंतराव बांगर यांच्या अंगावर झेप घेतली. जयवंतराव बांगरांनी डाव्या हाताने ढाण्या वाघ पेलला तर उजव्या हातातील गवत कापण्याच्या धारदार विळ्याने वाघ दोन भागात चिरत नरभक्षक वाघाला मारले म्हणून हिंगोलीकरांनी बैलगाडीवरुन नरभक्षक वाघाची गाव मिरवणुक काढली होती.खडकाळी मारोती डोंगर भाग सोडून हिंगोलीच्या तीन्ही बाजुची जमीन ही राजे बांगरांची . स्वर्गीय संपतरावजी बांगर यांचे वडील ग्यानबाराव पाटील हिंगोलीचे पाटील व पहिले नगराध्यक्ष, आठवडी बाजार मंगळवारा हा त्यांचा भाग. वाशीम हून शिक्षणासाठी आलेले होतकरु विद्यार्थी अॅड.शिवाजीराव देशमुख हे सुरुवातीपासूनच ग्यानबाराव यांच्याकडे शिक्षणानिमीत्त राहिले.तीसर्या पिढीपर्यंत त्यांचे संबंध आजही कायम आहेत. वंजारवाड्यात पुर्वी दोन पारंपारिक तालमी होत्या. महाराष्ट्राच्या कुस्तीची शान वाढवणारे पैलवान गंगारामजी बांगर याच लाल मातीच्या आखाड्यातले.गढीवर चढतांना एक तालीम तर गढी खाली एक तालीम या मुळ दोन तालीमी.
14 व्या शतकापासून हिंगोलीच्या गढीचे गडकरी पाराशर गोत्र असलेले बांगर राज घराण्याचा अंमल वरुडचक्रपाण ते पान्हकन्हेरगाव असा शंभर गावांचा अंमल असलेल्या या घराण्याला माहुरच्या ‘‘रायबाघीण’’ ही श्री छत्रपती शिवरायांकडून उपाधी मिळालेल्या घराण्याचा ‘‘रसुम’’(रसुम-म्हणजे राजकारभाराचे सर्व अधिकार हस्तांतरीत करत बरोबरीचे राज घराणे म्हणून मान्यता देणे) होता. देशमुखी प्राप्त असलेल्या बांगर राज घराण्याकडे विदर्भ मराठवाड्यातील दक्षिणोत्तर अथवा उत्तर दक्षिण अश्या देशांतर्गत वाहतूकीच्या व्यवस्थेची व मौल्यवान खजाने सुरक्षेची मोठी विश्वासपुर्ण व्यवस्था म्हणून हिंगोलीच्या बांगर गढीकडे भारतातील सर्वच राजे विश्वस्थ म्हणून विश्वास ठेवत यावरुन या घराण्याचे महत्व तसेच विश्वसनियता लक्षात यावी. वंजारी समाजाच्या महाराणी दुर्गावंतीच्या वंशाचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, बांगर हे महाराणी दुर्गावतींच्या वंशातील चित्रकुट ते गौंड हे त्यांचे साम्राज्य.थोडक्यात सांगायचे झाल्यास गौंड साम्राज्याचा विस्तार हा अखंड भारताच्या 42 % भूभागावर होता. यावरुन इतिहासातील वंजारी समाजाचे सामाजिक,राजकीय आर्थीक महत्व लक्षात येते. हा समाज जम्मु काश्मिर, पंजाबातील लुधियाना व भटींडा या दोन्ही जिल्ह्यात शंभरच्यावर बांगरवाड्या आहेत. तर उत्तर प्रदेशातील नोयडा हा भाग,उत्तराखंडाचा काही भाग, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगाणा ही वंजारी समाजाची जन्मभूमीच. तर तंजाउरचे राजे छत्रपती महाराजांबरोबर जे लढवय्ये सैनिक पाठविण्यात आले त्यात 1800 घोडदळ जाबांज कडवे लढवय्ये हे वंजारी समाजाचे सैनिकांची तुकडी श्री छत्रपती शहाजी महाराजांनी वङ्गादार म्हणून पाठवली होती.आजही तामीळनाडूस्थीत तंजाऊर श्री छत्रपती महाराजांच्या राजवाड्या भोवताल या लढवय्या समाजाची दोन अडीचशे घरे आहेत. चित्तोड ते जैसलमेर या भागामध्ये जुन्याकाळी इतिहासामध्ये लढवय्ये यौध्दे म्हणून वंजारी समाजाचा राजस्थानातील वीररसातील युध्द गितातून व लोक साहित्यातून दंतकथा व लोकगितातून स्पष्ट उल्लेखीत आहेत. अॅड. गणपतराव लक्ष्मणराव बांगर हे हिंगोलीच्या गडकरी बांगर घराण्यातील अतिविद्वान,शुध्द चारित्र्य संपन्न,धर्मज्ञानी, योगी पुरुष म्हणून तर कायदेपंडीत म्हणून महाराष्ट्रातील जाणकार त्यांना ओळखतो.त्याच बरोबर मराठवाड्यातील सामाजीक समतेची उपेक्षितांची,गोरगरीबांच्या न्यायीक मागण्यासाठी मोठे संघटन निर्माण केले प्रसंगी चळवळीतील कार्यकर्त्यांचे खटले खिशाला खार लावून लढले. सातारच्या पत्री प्रतिसरकारचे जनक नाना पाटलांचे ते खंदे समर्थक, मराठवाड्यात नाना पाटलांच्या त्या काळच्या जाहिर सभांचे आयोजक परभणीत वकीली करणारे अॅड.गणपतराव लक्ष्मणराव बांगर हे करत तसा उल्लेखही जुन्या वर्तमानपत्र व लेखकांच्या साहित्यातून स्पष्ट होतो. बीड जिल्ह्यातून नाना पाटील खासदार होण्यासाठी अॅड.गणपतराव बांगर यांची भूमीका निर्णायक होती. कारण बीड जिल्ह्यातील अख्खा वंजारी समाज नाना पाटलांच्या पाठीशी उभा केला. तर पिढानपिढ्या जुलमी निझामशाहीच्या अत्याचाराविरुध्द भूमिगत मोहिमेमध्ये हैद्राबाद येथे वकीलीचे शिक्षण घेत असतांना ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात आले व आपल्या पुर्वजांचा निझामविरोधी लढा त्यांनी अत्यंत जोमाने लढला. हिंगोलीतील वंजारवाडा हा निझामशाही सरकारच्या दस्तावेजावरुन असे लक्षात येते की,या वंजारवाड्यातील वंजारी समाजाने निझामाला वाशीम,अकोला,बुलढाणा,आजचा जालना,परभणी या भागात जेरीस आणले होते या असंतोषाचे मुख्य केंद्र हिंगोलीचा वंजारवाडा व हिंगोलीची बांगर गढीच होती हे स्पष्ट होते. समाज परिवर्तन व परिवर्तनातून समाजातील शेवटच्या उपेक्षित माणसांची सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे ही हिंगोलीच्या राजे बांगरांच्या गढीची शिकवण वकील साहेबांच्या रक्तात शेवटपर्यंत होती. या घराण्यांचा थोडक्यात वंजारी समाजाच्या इतिहासातील उगमाचा व त्यांच्या संघर्षाचा इतिहास या बद्दलचा सखोल अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, आर्यावृत्त म्हणजेच अखंड भारत हा सातव्या शतकामध्ये हुन,शक,यवन,व भयंकर लुटारु रक्तपिपासू ‘‘ पिंढारी’’ यांच्या जाचक त्रासातून व भयंकर लुट व मानवहानीतून सुटका हा मोठा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला होता. कारण भारताची रचना हि बारा ज्योर्तीलींगावरती व अंबाभवानीच्या एक्कावन्न शक्तीपिठावरती अवलंबुन आहे. आणि हिंदु धार्मिक यात्रेसाठी यात्रेकरुंना यात्रेवर जाणे जिकरीचे झाले. कारण पिंढारी लुटीस निघाले की ते जिथून गेले तो प्रदेश लुट व नासधुस करत निर्मनुष्य करत त्यामुळे शे दोनशे यात्रेकरुंची तर नामोनिशानही मिळणे अवघड अश्या परिस्थीतीत धर्म पालन अवघड होऊन बसले तर देशातील राज्या राज्यातील राजे रजवाडे,सरदार यांच्या मधील आर्थिक व्यवहारही मोडकळीस येऊ लागला. कारण या टोळ्यांनी लुटींचा धुमाकूळ घातला होता. राजे रजवाडे सरदार,अंमलदार यांची ताकद ही पिंढारी लुटारुंशी एक हाती लढण्याइतकी मजबुत नव्हती. पिंढारी कोणत्याही एका राजावर आक्रमण करुन केले की ते राज्य नेस्तानाबुत करीत यावरुन त्यांची क्षमता लक्षात यावी. लुट करुन ते घनदाट अरण्याच्या आश्रयाला जात. दिर्घकाल जंगलात लपून राहण्याची कला त्यांना अवगत होती त्यामुळे जंगलात जाऊन या लुटारुंचा पाठलाग करुन नष्ट करणे ही काळाची गरज झाली होती. हा प्रश्न पुर्ण भारतातुन लुटारु पिंढारींच्या जाचातून सुटका करुन घेण्यासाठी राजे रजवाड्यांनी हा विषय धर्म परिषदेकडे सोपावला. व मग धर्म परिषदेने ठरल्याप्रमाणे गोत्र व लढणार्या लढवय्या समुहाचा इतिहास हा भारतातील गावागावातील मंदीरातून तर विभागाीय पातळीवरील धर्म पिठाकडून संग्रहीकरण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये प्रचलित होता.त्यामुळे या सर्व गंभीर परिस्थीतीमध्ये देशांतर्गत धार्मिक स्वातंत्र्य निर्भयता व विश्वास कायम ठेवण्यासाठी तसेच राज्या राज्यातील आर्थिक, मौलिक धन संचय व मौलिक द्रव्य यांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न लुटारुंनी निर्माण करुन ठेवला होता. त्यामुळे देशांतर्गत आर्थीक व्यवहार धार्मिक व्यवहाराइतकेच क्षिण झाले होते. या सर्वांवर सखोल चिंतन करुन जे मौलिक चिंतन बाहेर आले व हिंदु धर्माची एक लढवय्यी नवी शाखा उद्घोषीत झाली त्या शाखेचे नाव म्हणजेच आजचा वंजारी समाज होय. सनातन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक जातीला,उप जातीला एक अर्थ आहे. स्वतंत्र इतिहास आहे तो गौरवशाली आहे. म्हणून ती स्वतंत्र जात आहे. परंतू एक हजार वर्षाच्या पारतंत्र्यात मोघल व इंग्रज यांनी आपल्या मर्जीप्रमाणे आपणास वाटेल तसा वेदांचा चूकीचा अर्थ लावत विकृत इतिहासाची निर्मीती करत तथाकथित संस्कृत विचारवंत मॅक्स म्युलर तर भारतीय अधूनिक शिक्षण पध्दीतीचे व इतिहासाचे जनक मॅकेले यांनी भारताचे सांस्कृतीक वाटोळे केले आहे. त्यामुळे भारताचा खरा इतिहास मुघलांनी त्यांच्या वंशजांनी हल्लेखोर अरबांनी,तुर्कांनी भारतातील प्राचिन विश्वविद्यालय तक्षशिला आणि नालंदा यातील इतिहासाला उध्वस्त करत लाखो इतिहासाचे दस्तावेज जाळून टाकले त्यामुळे भारताचा इतिहास हा लोकगितातून, दंतकथेतून जात्यावरील ओव्यातून बर्याच अंशी जिवंत आहे.त्यावर संशोधन ङ्गार कमी होत आहे. परंतू राजस्थानातील भाट पारंपारिक यौध्दा जमातींचा इतिहास आजही वर्षा दोन वर्षाला भारतभर ङ्गिरुन प्रत्येक कुटूंबाचा नियमाप्रमाणे नोंद घेत जिवंत ठेवत आहेत.त्यास शासनमान्यता नाही राज आश्रयही नाही परंतू माझ्या सारख्या छोट्याश्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांने याच राजस्थानी भाट लोकांकडून जो इतिहास जाणुन घेण्याचा प्रयत्न केला व त्यातून मला कळालेला यौध्दा वंजारी समाजाचा इतिहास मांडण्याचा यथोचित प्रयत्न. मुगल इतिहासकारांच्या बखरीमध्ये वंजारी समाजाचा उल्लेख ‘‘जंगजु जाबांज’’कडवट यौध्दा असा आहे.तर इंग्रज सर विल्यम ङ्गोर्ज यांच्या नोंदीप्रमाणे वंजारी वचनाला जागणारी व वचनासाठी मरणारी कडवट हिंदु यौध्दांची जमात असा उल्लेख आहे. स्वातंत्र्या नंतर असंघटीत व दर्या खोर्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या व सतत देश व धर्मासाठी सर्वस्व गमावण्याची तयारी ठेवणार्या समाजाच्या वाट्याला शासकीय उपेक्षा आली होती परंतू शिक्षणाची कास धरत आज या समाजाने आकाश ठेंगणे करुन ठेवले आहे. लिहण्यामागचा उद्देश माझे बंधूतुल्य परममित्र स्व.अशोकरावजी मल्हाररावजी बांगर यांना हे संशोधन व लेख समर्पीत करत आहे त्याचे धाकले बंधु दिलीप मल्हाराव बांगर तर आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोषराव बांगर यांच्या रुपाने तिसरी पिढी नेतृत्वाच्या समाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून लोकशाहीतील लढ्यामध्ये आघाडीने भाग घेत आहे.एकंदरीत हिंगोलीचे गडकरी राजे बांगर यांच्या गढीचा अभ्यास करतांना जे हाती लागले जे शक्य झाले ते मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न चुकभूल क्षमा असावी. महराष्ट्राच्या समाजिक परिवर्तनाची लढाई लढणारे आघाडीचे शिलेदार म्हणून अॅड.प्रतापराव गणपतराव राजे बांगर यांचा उल्लेख टाळणे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला शक्य होणार नाही.राजकारण हे समाज कारणाच्या बांधिलकीतून असाव आणि उपेक्षित समाजाचे संघटन हे सर्वांगिण विकासासाठी असावे हा पुरोगामी विचार हिंगोलीच्या गडकरी राजे बांगरांनी तीन पिढ्यापर्यंत चालवला. नव्या पिढ्यांना त्यांचा आदर्श तत्व,धोरण,ध्येय व दिशा यांचा परिचय व्हावा तसेच मराठवाडा विदर्भातील प्राचिन गढ्या व वाडे यांचे सामाजिक,राजकीय,धार्मिक काय महत्व होते याचा उकल करण्याचा प्रयत्न मी व माझे सहकारी करतात या लेखामागे एक भूमीका अशी की, हिगोली जिल्हा होत असतांना 1995 च्या शिवशाहीमध्ये हिंगोली तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा म्हणून वंजारवाड्यातील तत्कालीन आघाडीचे शिवसेनेचे शहर प्रमुख स्व.अशोकराव बांगर यांच्या हिंगोली बंदच्या हाकेला मुख्य मंत्री मनोहर जोशी यांनी ओ देत असतांना तत्कालीन शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी चंग बांधून हिंगोली जिल्ह्याची घोषणा करुन घेतली हे ही तितकेच खरे रावते यांचा पुत्रवत आवडता कार्यकर्ता म्हणजे स्व.अशोकराव बांगर थोडक्यात स्व.अशोकराव बांगरांच्या हट्टा पायी हिंगोली जिल्हयाची निर्मीती रावते साहेबांनी केली.त्यास तत्कालीन खासदार शिवाजीराव माने,डॉ.जयप्रकाश मुंदडा,आ.गजानन घुगे यांचे मौलिक सहकार्य होते. महाराष्ट्रातील वंजारी समाजाच्या विदर्भ,मराठवाडा,कोकण,पश्चिम महाराष्ट्र व मुंबईचा उपनगरीय भागातील, सांगळे,घुगे,गिते,बुधवंत अशा लढवय्या सरदारांच्या किमान दिडशे गढ्यांची नोंद शासन दरबारी असायला पाहिजे होती. परंतू ती नाही याची खंत वाटते.........
लेखक - सतीश सातोनक रपरभणी
0 टिप्पण्या