💥प्रहार ऑटो रिक्षा चालक/मालक संघटनेची जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकठे निवेदनाव्दारे मागणी💥
परभणी - मागील वर्षभरापासुन काही महिने वगळता सततचे लाकडाऊन व कडक निबंधामुळे जिल्हयातील ऑटो रिक्षा मालक व चालक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य शासनाच्या वतीने चालू वर्षी एक हजार पाचशे रुपयाची एक रक्कमी मदत केली आहे परंतु ती खुपच तूटपुंजी आहे. जिल्हयात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित तरुण स्वयंरोजगाराकडे वळले आहेत.
त्यापैकी अनेकांनी विविध शासकीय बँका व खाजगी फायनान्स कंपन्यां कडुन कर्ज काढुन ऑटो रिक्षा खरेदी केला करून आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह ते भागवत आहेत. मागील दिड वर्षापासुन आलेल्या कोवीड संकटामुळे देशासह जिल्हयात अनेकदा लोकडाऊन व कडक निबंध लावण्यात आले आहे. याही वर्षी मार्चपासून राज्यासह जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास जनतेला प्रतिबंध लावण्यात आले आहे यामुळे रोजच्या रोज कमाई करुन खाणाऱ्या हातावर पोट असणारे ऑटो रिक्षा मालक व चालक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहे. त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील शक्य होत नाही. अशा परिस्थिती ज्या ऑटो रिक्षा मालकांनी शासकीय बँका व खाजगी फायनान्स कंपन्या यांच्याकडुन अर्थ सहाय्यावर जे ऑटो घेतले आहेत त्या ऑटोचे मासिक हप्ते थकलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये बँका व फायनान्स कंपन्या हप्त्याच्या वसुलीसाठी सक्ती करीत असुन ऑटो रिक्षा मालकांना नोटीस पाठवून मानसिक छळ करीत आहेत त्यामुळे बँकेचे हफ्ते भरण्याची इच्छा असून ही लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगी मुळे ऑटो रिक्षा मालकांना दिलासा मिळावा म्हणून शासकीय बँका व खाजगी फायनान्स कंपन्या यांच्या वतीने होणारी सक्तीची हफ्ते वसुली तत्काळ थांबवावी या मागणी साठी आज प्रहार ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने ऑटो रिक्षा मालकांच्या शिष्ट मंडळासह श्री.दिपक मूगळीकर जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
बँक व फायनान्स कंपनीकडुन थकलेल्या हप्त्याच्या बदल्यात ऑटो रिक्षा जप्त करण्यासारखे चिड आणणारे प्रकार घडत आहेत यामुळे ऑटो चालक व मालक मोठया प्रमाणावर भयभीत व हतबल झाले आहेत. अशा प्रसंगात एखाद्या ऑटो मालकाकडुन टोकाचे पाऊल उचलले जाण्याची भिती आहे. हातावर पोट असणाऱ्या व प्रामाणिकपणे आयुष्य जगणाऱ्या स्वाभिमानी ऑटो रिक्षा मालक व चालक यांची हतबलता व आर्थिक तंगी विचारात घेता जिल्हयातील शासकीय बँका व खाजगी फायनान्स कंपन्या यांना किमान सहा महिन्यासाठी सक्तीची वसुली करु नये असे आदेश आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने देण्यात यावे असे ही या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने,युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटु कदम, प्रहार ऑटो रिक्षा संघटनेचे शहर प्रमुख बंडू पावडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर,विलास शिंदे,सोपानराव धडे,शंकर अरळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या