💥जिल्ह्यात वैद्यकीय सेवा व कृषी निविष्ठा तसेच सहाय्यभुत सेवा देणाऱ्या आस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत सुरू💥
परभणी (दि.२८ मे २०२१)- जिल्ह्यातील कोरोना विषाणु संसर्ग साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाने दि.३१ मे २०२१ पर्यंत लॉकडाऊन (संचारबंदी) जाहीर केला आहे. मध्यंतरी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणून प्रशासनाने किराणा दुकाने, भाजीपाला व फळविक्रीस सकाळी ७-०० ते ११-०० या वेळेत सुट दिली होती. परंतू जिल्ह्यात नागरिकांची रस्त्यावरील गर्दी ओळखून प्रशासनाने उद्या शनिवार दि.२९ मे ते रविवार दि.३० मे २०२१ या दोन दिवसांच्या कालावधीत किराणा दुकाने,भाजीपाल्यासह फळविक्रीवर सुध्दा बंदी घातली आहे.
वैद्यकीय सेवा व कृषी निविष्ठा तसेच सहाय्यभुत सेवा देणाऱ्या आस्थापना सकाळी ७-०० ते २-०० वाजेपर्यंत तसेच दुध विक्रेता यांनी सकाळी ९-०० पर्यत मुभा दिली आहे. या आस्थापणा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवावे. तद्नंतर सोमवार ते शुक्रवार पर्यंत वरील सुट दिलेल्या आस्थापना कालावधीत चालू राहतील, असे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज शुक्रवारी लागू केलेल्या एका आदेशाद्वारे म्हटले आहे...
0 टिप्पण्या