💥महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती हा महाराष्ट्राचा एक प्रकारे सन्मान आहे💥
1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आदरणीय सुबोध कुमार जैस्वाल साहेबांची प्रशिक्षणार्थी म्हणून पहिली पोस्टिंग झाली ती मराठवाड्यातील औरंगाबाद येथे म्हणून आम्हा मराठवाडा करांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे.
राजपत्रित अधिकाऱ्यांशी कसे वागले पाहिजे आणि कसे वागले नाही पाहिजे याचे धडे देशभर.. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या आदर्श राज्यकर्त्यांचे उदाहरण देशभर दिल्या जायचे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 1980 पर्यंत पोलीस दलातील बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसायचा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट तपास व कारवाईचे तातडीने दखल घेणारे व्यवस्थापन खात्यांतर्गत त्यावेळेला होते कार्यतत्पर राहणार या अधिकाऱ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत असे... त्यासाठी कुणाचा राजकीय लगा लावण्याची गरज पडायची नाही आणि म्हणून तपासामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नव्हता... गुन्हेगारांना शंभर टक्के शिक्षा मिळणार अशा पद्धतीने गुन्हा रजिस्टर व्हायचा... या कालावधीमध्ये गुन्हा रजिस्टर झाला की 100% शिक्षा होणार त्याचे प्रमाणही 85% याच्यावर होते असे लक्षात येईल.
कालांतराने नको तेवढा राजकीय हस्तक्षेप झाला राज्यकर्त्यांची महत्वकांक्षा वाढली कि शिस्तीचा बंध हळू हळू सईल होतोच....त्याचे परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतात कारण सर्वसामान्य माणसाचे संरक्षण फक्त पोलीसच करू शकतो हे कटू सत्य आहे अशा परिस्थितीतही महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांची कार्यतत्परता कार्यपूर्ती ची गौरवशाली परंपरा कायम ठेवत अति अधिक श्रीमंत व वृद्धिंगत केली अशा कार्यतत्पर अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासामध्ये आदरणीय सुबोध कुमार जैस्वाल साहेब यांचे नाव अत्यंत अभ्यासू सूक्ष्म निरीक्षण, पोलिसिंग प्रणालीचा प्रचंड अभ्यास तसेच शिस्तबद्ध स्वभाव आपल्या सहकाऱ्यांना सतत प्रोत्साहन देणे व त्यांना बरोबर घेत मोहीम यशस्वी करणे आणि कार्य तत्परता वाढवून अत्यंत तोकड्या पोलीस दलातील संख्या बळामुळे सहकारी कर्मचाऱ्यांना दुप्पट वेळ काम करावे लागते. याची जाण असलेला वरिष्ठ अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
अत्यंत भूषण व सन्मानजनक गोष्ट अशी की यापूर्वी त्यांनी RAW research and analysis wing भारताच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटनेमध्ये दहा वर्षे उत्कृष्ट कार्य केले कालांतराने त्यांच्या उत्कृष्ट निष्कलंक सेवेमुळे आदरणीय सुबोध कुमार जैस्वाल साहेबांची नियुक्ती महाराष्ट्र पोलीस दलाच्या सर्वोच्च महासंचालक पदी नियुक्ती झाली परभणीचे तत्कालिन पोलीस अधीक्षक के एल प्रसाद साहेबांना फार जवळून पाहण्याचा योग मला महाविद्यालयीन विद्यार्थी असताना आला कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते मागच्या सरकारमध्ये नियम आणि कायदे डावलून के एल प्रसाद साहेबांचा प्रशासकीय अपमान केला असे घडत आज त्यांनी तात्काळ आपला राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पाठवून दिला.
आयुष्यभर प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली मग मात्र ते कुणाची पर्वा करत नसतात हे मी जवळून अनुभवले आहे आदरणीय सुबोधकुमार जयस्वाल साहेब यांच्याबाबतीतही महाराष्ट्रात पोलीस महासंचालक पदी असताना त्यांच्याकडे सतत कानाडोळा करण्यात आला व प्रशासकीय नियम बाजूला ठेवून काही निर्णय घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेच प्रतिनियुक्तीवर दिल्ली गाठले असे घडणे महाराष्ट्राच्या राजशिष्टाचार आला व संस्कृतीला धरून नक्कीच नव्हते आपले उभे आयुष्य या माणसाने महाराष्ट्रामध्ये जनसेवेसाठी पोलिसांची व सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी यासाठी कार्य केले त्यांना महाराष्ट्र अशा पद्धतीने सोडावे लागला ही दुःखद आहे काळाचा महिमा पहा त्यांच्या कार्याची दखल देशाने घेतली.
आदरणीय सुबोध कुमार जैस्वाल साहेबांची नियुक्ती सीबीआयच्या प्रमुखपदी करण्यात आली आहे खरे पाहिले तर महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती हा महाराष्ट्राचा एक प्रकारे सन्मान आहे महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य मतदार व नागरिक या नात्याने मी आपले अभिनंदन करतो साहेब आपल्या सारख्या पोलीस अधिकाऱ्यावर महाराष्ट्राला गर्व आहे आम्ही जनता आपल्यावर प्रेम करतो एवढे ध्यानी असू द्या कारण महाराष्ट्राची भूमी कर्तुत्वान माणसांमुळे सुपुत्रा मुळे अधिक श्रीमंत होते आपण आपल्या वागण्यातून कर्तव्यपरायण स्वभावातून महाराष्ट्राच्या या भूमीला एक सन्मान प्राप्त करून दिला आहे पुनश्च एकवार आपल्याला शुभेच्छा व आपले अभिनंदन.
💐महाराष्ट्र पोलीस दलाचे व पोलीस बांधवांचे विशेष अभिनंदन...💐
✍️लेखक: सतीश सातोनकर परभणी (महाराष्ट्र)
0 टिप्पण्या