महाराष्ट्र, तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यांशी केंद्र सरकार झारखंडची तुलना का करत आहे ? असा रोखठोक प्रश्न झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित केला आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक अधिकार पूर्णपणे स्वत:कडेही घेतले नाहीत आणि राज्यांनाही दिले नाहीत असं सांगतानाच करोनासारख्या राष्ट्रीय प्रश्नावर केंद्र सरकारने तुमचं तुम्ही बघा ? असं धोरण राज्यांबाबतीत घेतल्याची टीका सोरेन यांनी केलीय.
मोदी सरकारने राज्यांच्या समस्येंकडे पाठ फिरवल्याची तक्रार करतानाच करोना साथीच्या नियोजनासंदर्भात सरकारने केलेल्या अपुऱ्या तयारीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार करोनाच्या साथीला राष्ट्रीय समस्या मानत नाहीय तसेच राज्यांनी केलेल्या मागण्या ऐकून समोर आलेल्या परिस्थितीला राज्यांनी आपल्या पद्धतीने तोंड द्यावं असं केंद्राचं धोरण असल्याची नाराजी सोरेन यांनी व्यक्त केलीय.
द संडे एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोरेन यांनी रोकठोकपणे आपली मतं मांडली आहे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची मागणी लस खरेदी करण्यात आमचं दिवाळं निघेल झारखंडमधील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारला साडेतीन ते चार कोटी लसी विकत घ्याव्या लागतील असं सोरेन यांनी सांगितलं आम्हाला आतापर्यंत ४० लाख लसींचे डोस मिळाले आहेत यासाठी खूप जास्त खर्च येतो झारखंड सरकार असं करु शकत नाही असा सोरेन यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे....
0 टिप्पण्या