💥गावातील हातपंच अदुरूस्त पाण्याचे फिल्टरही पडले बंद ? नागरी सुविधां संदर्भात तक्रार करणाऱ्यांना घरपट्टी भरण्याची सक्ती💥
विशेष प्रतिनिधी -
पुर्णा (दि.२२ मे २०२१) - तालुक्यातील "गौर गाव तसे चांगले परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या गैरकारभाराने म्हण वेशीला टांगले" अशी अवस्था या गावाची झाली असतांना मात्र परभणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील दि.१७ मार्च २०२१ रोजी आर.आर.पाटील सुंदर गाव योजने संपूर्ण तालुक्यात प्रथम सुंदर ग्रामपंचायत म्हणून गौर गावाची निवड करण्याचा खटाटोप जिल्हा परिषद प्रशासनाने कोणत्या आधारे केला असावा ? असा प्रश्न उपस्थित होत असून तब्बल ४००० ते ४५०० हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या विकासासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिल्यानंतर ही या गावाचा म्हणावा त्या पध्दतीने विकास झाल्याचे निदर्शनास येत नाही.
गौर ग्रामपंचायत प्रशासनाने भर उन्हाळ्याचे दिवस असतांना गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नयें याकरिता कुठलेही ठोस पाऊल उचलल्याचे निदर्शनास येत नसून गावातील अनेक हातपंप दुरूस्तीअभावी बंद पडले असून नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता गौर ग्रापंचायत प्रशासनाने बसवलेले आरो वॉटर फिल्टरही अल्पकालावधीतच बंद पडल्याने नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी खाजगी पाणी विक्रेत्यांकडून विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे.पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह गावातील तुंबलेल्या नाल्या साचलेले कचऱ्यांची ढिगार आदींच्या स्वच्छतांसह गावातील विविध नागरी समस्यांच्या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करण्यास गेलेल्या नागरिकांना संबंधित ग्रामपंचायच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांकडून घरपट्टी नळपट्टी भरण्याची सक्ती केली जात असल्याने नागरिक तक्रार करण्यासही धजावत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचे निदर्शनास येत असून गावातील महिला अबाल वृध्दांसह नागरिकांना मिळेल त्या वाहणांचा वापर करीत दोन ते तिन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने गावातील नागरिक त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून गावातील नागरिकांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी मात्र ग्रामपंचायत कार्यालया प्रमाणेच जुन्या पाण्याच्या टाकीला सुध्दा रंग देण्याच काम युध्दपातळीवर करण्यात आल आहे परंतु सदरील पाण्याच्या टाकीतून मागील अनेक वर्षापापासून गावकऱ्याना एकही भांड पाणी मिळालेल नाही कारण या पाण्याच्या टाकीतून करण्यात आलेली पाणी पुरवठा पाईप लाईन मागील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याचे समजते पाणी पुरवठा पाईप लाईन दुरुस्ती साठी अनेकवेळा उपलब्ध झालेला विकासनिधी शेवटी पाण्यातच गेला की काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.....
0 टिप्पण्या