💥गौर गावात पिण्याच्या पाण्यासह गावातील स्वच्छतेच्या प्रश्नाने घेतले गंभीर वळण💥
पुर्णा (दि.२४ मे २०२१) - परभणी जिल्हा परिषद प्रशासनाने पुर्णा तालुक्यातील सर्वात सुंदर गाव म्हणून निवड केलेल्या गौर ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट व निश्क्रिय कारभाराची लख्तर आज गावातील नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांवर आज सोमवार दि.२४ मे २०२१ रोजी अखेर वेशीवर टांगण्याची वेळ आली कारण गौर गावातील पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याची गंभीर समस्या,गावातील स्वच्छते अभावी तुंभलेल्या नाल्यांसह गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य,सार्वजनिक स्वच्छता गृहांची मोडकळीस येवून झालेली दुरावस्था,नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ मिळावे याकरिता अत्यंत गाजावाजा करीत बसवण्यात आलेले अल्पकालावधीतच बंद पडलेले वॉटर फिल्टर आदी नागरी असुविधां संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर ही गौर ग्रामपंचायतीचे सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर नागरीकांना नागरी सुविधा पुरवण्याऐवजी वाढत्या कोरोना महामारीमुळे शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन सारख्या परिस्थितीतही तुम्ही अगोदर घरपट्टी नळपट्टी भरा असे म्हणून त्यांना धुडकाऊन लावण्याचेही प्रकार घडल्याने शेवटी त्रस्त झालेल्या या गौर गावातील नागरिकांनी आज सोमवार दि.२४ मे रोजी तहसिलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती पुर्णा यांच्याकडे गौर ग्रामपंचायतीच्या बेजवाबदार कारभारा विरोधात लेखी स्वरूपात तक्रार दिली.
तालुक्यातील गौर येथील नागरिकांनी तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की गौर गावातील दोन वॉटर फिल्टर प्लांट दुरूस्ती अभावी बंद असल्याने मागील अनेक दिवसापासून नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही पाणी वेळेवर येण्याचा तर प्रश्नच नाही.परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील ज्या पाण्याच्या टाकीतून मागील अनेक वर्षापासून गावातील लोकांना पाण्याचा एक थेंब सुध्दा मिळालेला नाही कारण गावात घरपोच नळांची सुविधाच नाही त्या टाकीची रंगरंगोटी का केली असावी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे त्याचबरोबर गावातील गटार स्वच्छतेअभावी तुंबल्याने या अस्वच्छ व तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत असून गावातील अबालवृध्द लहाण मुल विविध साथींच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत स्वच्छते संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केल्यास मानस मिळत नाही काम करण्यासाठी तर आम्ही काय ? असा प्रतीप्रश्न उपस्थित केला जातो.
तालुक्यासह ग्रामीण भागातही कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असतांना गौर ग्रामपंचायतीचा निश्क्रिय कारभार एकंदर नागरिकांच्या जिविताशी अक्षरशः खेळ खेळत असल्याचे दिसत असून नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास,गावातील नाल्यांसह परिसरातील स्वच्छता करण्यास संपूर्णपणे अकार्यक्षम ठरल्याने व अनेकवेळा तक्रारी देऊनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने व आजही ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावातील नागरिकांना शेवटी नाईलाजास्तव तहसिलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती पुर्णा यांच्याकडे तक्रार करावी लागली नमूद तक्रारीत नागरिकांनी गौर गावाला जिल्हा परिषद प्रशासना मार्फत आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाल्या संदर्भात ही प्रश्न उपस्थित केला असून गावातील अस्वच्छ व अनियमीत पाणी पुरवठा,स्वच्छतेअभावी तुंबलेली गटार,गावातील रस्त्यांसह अस्वच्छ परिसर याकरिताच गावाला तालुक्यातील सर्वात सुंदर गाव पुरस्कार भेटला की काय ? आता असेच गौर गावकऱ्यांना वाटत आहे.
शासनाचा कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर ही गावात बारगळलेली पाणीपुरवठा योजना,निकृष्ट दर्जाची रस्ते नाल्यांची कामे,वृक्ष लागवडीची रेंगाळलेली काम,ग्राम स्वच्छ अभियाना अंतर्गत गावात बांधण्यात आलेली निकृष्ट दर्जाची स्वच्छतागृह,आदींसह असंख्य विकासकामांचा निधी थातूरमातूर काम करून गावाच्या विकासाला खिळ बसवण्याचा प्रकार म्हणावा लागेल ना ? अशीच काहीशी अवस्था गौर गावाची झाली आहे....
0 टिप्पण्या