💥त्यांच्या पश्चात तीन मुले,चार मुली,सुना,नातवंडे,पंतू असा भरगच्च परिवार आहे.💥
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पौळ यांच्या आईचे वयाच्या ९५ व्या वर्षी सोमवारी (दि.१७) वृध्दपकाळाने दुखःद निधन झाले.
तालुक्यातील कासारवाडी येथील रहिवाशी तथा जेष्ट नागरीक आशाबाई यादवराव पौळ (वय ९५) यांचे सोमवारी (दि.१७) दुखःद निधन झाले. त्यांच्यावर मूळगावी रामेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाबाई पौळ या धार्मिक, सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असत. यामुळे पंचक्रोशीत सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली,सुना,नातवंडे, पंतू असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पौळ यांच्या त्या मातोश्री होत.
0 टिप्पण्या