परभणी (दि.१८ मे २०२१) - रासायनिक खतांची निर्मिती करणाऱ्या सर्व खत कंपन्यांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अचानक सर्व रासायनिक खताच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत.खत कंपन्यांनी केलेली खतातील मोठी दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी परभणीचे शिवसेनेना खासदार संजय जाधव यांच्यासह एका शिष्टमंडळाने केली.
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आज मंगळवार दि.१८ मे २०२१ रोजी खतवाढी विरोधात एक निवेदन देण्यात आले या निवेदनात असे नमूद करण्यात आले की सर्वसामान्य शेतकरी गेल्या काही वर्षापासून अक्षरक्षः आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यातच अलिकडे लागलेल्या लॉकडाऊनचा तडाखा शेतकऱ्यांना बसतो आहे गहु,ज्वारी,चना, तूर आदी माल विकता आला नाही. अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या घरी शेतमाल पडून आहे. त्याचे नुकसान होत आहे. अशा या स्थितीत रासायनिक खताच्या कंपन्यांनी प्रतिबँग तब्बल ६०० ते ७०० रुपयांची वाढ केली. ती खताची ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी जुन्या दरानेच तेच मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावा असे खासदार जाधव,गंगाप्रसाद आनेराव, प्रा.पंढरीनाथ धोंडगे, अतुल सरोदे,अर्जुन सामाले यांच्यासह एका शिष्टमंडळाने केली. दर वाढ मागे न घेतल्यास प्रखर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे....
0 टिप्पण्या