💥यावेळी जिल्हाधिकारी यांचा शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह स्मरणिकेसह 'कोविड योद्धा' सन्मानपत्र देऊन सत्कार💥
पूर्णा ; महामानव तथागत भगवान बुद्ध यांची 2565 वी जयंती (वैशाखी पौर्णिमा) पूर्णा शहरामध्ये को विड महामारी ची पार्श्वभूमी लक्षात घेता पुरेशी खबरदारी घेऊन साजरी करण्यात आली. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय दिपक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोविड लसीकरण शिबिराचे जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पया वंश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले हो ते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार पल्लवी टेमकर डॉक्टर बी एस नरवाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे नगराध्यक्षा चे प्रतिनिधी संतोष एकलारे नगरपालिकेचे गटनेते उत्तम खंदारे नगरसेवक ॲड. हर्षवर्धन गायकवाड ॲड.धम्मा जोंधळे मुकुंद भोळे यांची उपस्थिती होती.
जयंती मंडळ व बुद्ध विहार समिती च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह स्मरणिका व कोवि ड योद्धा सन्मान देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. माननीय जिल्हाधिकारी यांनी को वी ड लसीकरण शिबिराची व कोविड रुग्ण नातेवाईकांच्या निवास व भोजना स्थळाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले महामानव तथागत भगवान बुद्ध यांनी जगाला सत्य अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला. महामानव तथागत भगवान बुद्ध यांनी गृहत्याग का केला हे जातक कथेमधून उलगडून सांगीतले.
बुद्ध विहारातील तरंग मनाला प्रसन्न करून काम करण्याची ऊर्जा देत असतात. पूर्णा येथील बुद्धविहारत डॉ .उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला दिशा दाखवण्याचं प्रबोधनाचे काम खूप चांगल्या पद्धतीने होते अशाप्रकारे भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये जयंती मंडळामार्फत व विहारा मार्फत राबविले जाणारे समाज उपयोगी प्रबोधनात्मक कार्याची माहिती दिली. भंते पया वंश यांनी वैशाखी पौर्णिमा चे महत्व व भगवान बुद्धांचे मानवतावादी विचार याविषयी आपल्या धम्मदेशना मध्ये सखोल मार्गदर्शन केले जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी भगवान बुद्धांचे विचार कालसुसंगत आहेत या विचारानेच मानव जातीची शाश्वत प्रगती होऊ शकते.
वैशाखी पौर्णिमेनिमित्त सकाळी बुद्ध विहारांमध्ये परित्राण पाठ सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्म ध्वजारोहण बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी दहा वाजता पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण साडेदहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन याठिकाणी पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण अकरा वाजता शांतीनगर या ठिकाणी पंचरंगी धम्म ध्वजारोहण पाच वाजता प्राचार्य मोहनराव मोरे यांनी कानन खेड शिवारातील ते 33 गुंठे जमीन बुद्धविहाराचे विकास कामासाठी दिली त्या जागेवर नाम फलक व पंचरंगी धम्मध्वजारोहण व बोधिवृक्षा चे वृक्षारोपणकरण्यात आले.
सूत्रसंचालन श्रीकांत दिवाळी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृत मोरे टी. झेड कांबळे श्यामराव जोगदंड वा.रा काळे गुरुजी मुगाजी खंदारे दिलीप गायकवाड विजय बगाटे पीजी रणवीर बौद्धाचार्य त्रंबक कांबळे अतुल गवळी किशोर ढाक रगे अमृत कराळे शिवाजी थोरात बाबाराव वाघमारे मुंजाजी गायकवाड संभाजी गायकवाड सम्राट अहिरे राहुल दवणे गौतम सोनुले जयंती मंडळाचे राजकुमार सूर्यवंशी संजय शिंदे मिलिंद सोनकांबळे शेख नसीर सुभाष पांडव वीर आदींनी परिश्रम घेतले...
0 टिप्पण्या