💥अशी मागणी शिक्षक आ.विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे💥
परभणी (दि.२५ मे २०२१) - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास बंद केला असून त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या संख्येने बाधित होताना दिसत आहेत विद्यार्थी पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी तयारीला लागले असल्याने आता पुन्हा दहावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थी तणावाखाली येतील. त्यामुळे दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवा अशी मागणी शिक्षक आ.विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
तसेच गतवर्षी अधिवेशनात औरंगाबाद व अमरावती येथील ऑनलाईनपद्धतीने होणारे आकरावी प्रवेश रद्द करावेत अशी मागणी आ.सतीश चव्हाण व आ.विक्रम काळे यांनी केली होती ती मान्य करुन सन २०२१-२२ पासून ऑनलाईन प्रवेश रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री यांनी सांगितले.याचबरोबर आ.विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्री यांच्याकडे अनुदानाचे प्रचलित धोरण लागू करावे. अघोषित शाळांना वेतन अनुदानासह घोषित करावे.त्रुटि पूर्तता शाळांची यादि घोषित करावी.सन २०१९-२० व २०२०-२१ ची पट संख्या ग्राह्य धरावी.अनुदान आदेशातील शिक्षक पदसंख्येची दुरुस्ती करावी. तसेच शिक्षकांना जूनी पेंशन योजना लागू करावी आदि मागण्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केल्या असता वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत याबाबतीत लवकरच बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री यांनी सांगितले असल्याचे आ.विक्रम काळे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे...
0 टिप्पण्या