💥पोलीस स्थानकात गोंधळ,सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल झाला होता जैस्वाल यांच्यावर गुन्हा💥
औरंगाबाद (दि.३१ मे २०२१) : औरंगाबाद येथील शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात ६ महिन्यांची शिक्षेसह २,५००/- रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
💥प्रकरण काय आहे ?
२० मे २०१८ रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या दंगली प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली होती याविषयी माहिती मिळताच रात्री ११-०० वाजेच्या सुमारास शिवसेना पक्षाचे तत्कालीन औरंगाबाद महानगर प्रमुख या पदावर असलेले प्रदीप जैस्वाल हे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी तेथे तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत, असे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली. उद्या शहरामध्ये काय घडते ते बघा, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्यांनी पेन स्टॅण्डने टेबलावरील काच फोडली. फिर्यादीनुसार सहायक पोलीस निरीक्षक संजय बनकर,हवालदार संगीता राजपूत, आशा आडागळे, मंगला सोनवणे, सिंधू गिरी हे क्रांती चौक पोलीस स्थानकात हजर असताना जैस्वाल यांनी गांधीनगर येथून पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना सोडा तुमचे काम बंद करा आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा असे म्हणत पोलीस स्थानकात गोंधळ घातला होता.
या घटनेनंतर वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पोटे यांनी जैस्वाल यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे,सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदविला होता या घटनेनंतर जैस्वाल यांना अटक करण्यात आली होती त्यांना ३ दिवस न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती याप्रकरणी कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार चंद्रकांत पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना पोलीस उपनिरीक्षक अजय सुर्यवंशी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात मुख्य सरकारी वकिल अविनाश देशपांडे यांनी ५ जणांच्या साक्ष नोंदवल्या सुनावणीनंतर जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एम. भोसले यांनी प्रदीप जैस्वाल यांना कलम ३५३ अन्वये ६ महिन्याची शिक्षा व २,५००/- रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये ६ महिने व २,५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड.अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले त्यांना अॅड.सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले....
0 टिप्पण्या