💥पूर्णेत भगवान बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलतांना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केले प्रतिपादन💥
पुर्णा ; तथागत भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी गृहत्याग केला या जगा मध्ये माणसाच्या मनात तृष्णा आहेत हेच दुःखाच कारण आहे तृष्णेचा त्याग केल्याशिवाय सुख मिळणार नाही हे दाखवून दिले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले.
पूर्णा शहरात भगवान बुद्ध यांच्या २५६५ वी जयंतीचा निमिताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ५:30 वा बुद्ध विहार येथे परित्राण पाठ सुत करण्यात आले सकाळी ९ वा डॉ. आंबेडकर चौक येथे डॉ. आंबेडकरांच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शामराव जोगदंड यांच्या हस्ते पंचशिल धवजाचे ध्वजारोहन करण्यात आले १० वा बुद्ध विहार येथे भदंत डॉ. उप गुप्त महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण डॉ. आंबेडकर नगर येथे एम.यु. खंदारे ,एच.आर. ढाकरगे गंगाधर खरे यांच्या हस्ते शांतीनगर येथे नगरसेवक उत्तम खंदारे, अॅड धम्मा जोंधळे, प्रकाश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले दुपारी १२:30 वा. मुळ कार्यक्रमा सुरुवात करण्यात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या हस्ते भगवानबुद्ध व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या तैल चितास पुष्प अर्पन करून अभिवादन करण्यात आले जिल्हाधिकारी यांनी करोना बाधित रुग्णाच्या नातेवाईका साठी निवाऱ्याची सोय करण्यात आलेल्या बेडची पाहणी केली त्या नंतर लसीकरण शिबिरास भेट दिली 100 नागरीकाना लस देण्यात आली भेट देवून पाहणी केली यावेळी कार्यक्रमाच्य । अध्यक्षस्थानी प्राचार्य मोहनराव मोरे प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो,भन्ते पंयावंश भन्ते संघरत्न ,' जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर उपविभागीय अधिकारी सुधिर पाटील तहसिलदार पल्लवी टेमकर नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे ,डॉ.बी.एस नरवाडे, डॉ. संघमित्रा नरवाडे प्रमुख उपस्थिता मध्ये जयंती मडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश काबळे, उत्तम खंदारे ,दादाराव पंडित, धम्मा जोंधळे , हर्षवर्धन गायकवाड अनिल खर्गखराटे, मुकूंद भोळे यादव भवरे ,आशोक धबाले आशोक व्ही कांबळे ,दिलीप गायकवाड ,शामराव जोगदंड, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश मुळे याच्यासह बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे यांनी केले....
0 टिप्पण्या