💥स्थानिक प्रशासन तेथील परिस्थिती पाहून शिथिलतेबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे 💥
औरंगाबाद : राज्यात 7 जून 2021 पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. निर्बंधातील शिथिलतेच्या मर्यादेबाबत विविध 5 पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यात आल्या आहेत. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन तेथील परिस्थिती पाहून शिथिलतेबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील निर्णयासाठी District Disaster Management Authority अर्थात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (6 जून) रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील रुग्णसंख्या, Positivity Rate व इतर अनुषंगिक बाबीवर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर जिल्हयातील शिथिलतेच्या पातळीबाबत (Level Of Relaxation) निर्णय घेतला जाईल आणि सदरचा निर्णय उद्या सर्व माध्यमांना कळविला जाईल याची कृपया नोंद घ्यावी, असे मुकुंद चिलवंत ( जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद) यांनी कळविले आहे...
0 टिप्पण्या