💥काल 9 जुन रोजी दिवसभरात राज्यात 261 बाधित रूग्णांचा मृत्यू💥
मुंबई : आज दिवसभरात राज्यात 16,369 रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर 10,989 नवीन बाधित आढळून आले. याशिवाय, 261 बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट आता देशभरासह राज्यातील हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मात्र निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाहीत. करोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 55,97,304 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 95.45 टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत 1,01,833 बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 1.74 टक्के एवढा आहे आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,71,28,093 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,63,880 (15.79 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज रोजी एकूण 1,61,864 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
0 टिप्पण्या