💥पालम येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न💥
पालम ( विनोद कांबळे) :- स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे.अपयशाने खचून न जाता नियमितपणे अभ्यास करून चिकाटीने सामोरे जावे यश आपलेच आहे. असे प्रतिपादन डीवायएसपी सचिन सांगळे यांनी केले.
पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात दिनांक 10 जून 2021 रोजी गुरुवारी सकाळी ठिक 11 : 00 वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा : काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन शिबीरात बोलत होते.या प्रसंगी सुरुवातीला प्रा.डॉ घ.ना.पांचाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम आरसुळे यांनी आपले प्रास्ताविक भाषण व मनोगत व्यक्त केले, त्यांनी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण व आपले कॉलेज प्रशासन सर्व प्राध्यापक वर्ग नेहमी कटीबद्ध राहुन काम करु अशी ग्वाही दिली. या शिबिराला बीजभाषक म्हणून मा.सचिन सांगळे ( पोलिस उपअधीक्षक देगलुर ) हे होते , मा. विश्वबंर बापुराव कऱ्हाळे ( नुतन पोलिस उपनिरीक्षक ) व मा.रेखा बन्सी काळे ( पोलिस उपनिरीक्षक राजुरा जि चंद्रपूर ) यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
यानंतर कॉलेज चे माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर संचलित, माधवराव पाटील महाविद्यालयाने मागील 28 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे.या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धापरिक्षा किती महत्त्वाची आहे व यामुळे आपले जीवन कसे बदलु शकते यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आत्माराम आरसुळे हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ घ.ना पांचाळ ( माजी विद्यार्थी समिती प्रमुख ),प्रा.डॉ यु.जी निर्वळ ( माजी विद्यार्थी समिती सदस्य ) यांनी केले . हे शिबिर प्रा.डॉ.राहूल देशमुख यांच्या सहकार्याने पुर्णतः ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संजय बालाघाटे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.निर्वळ यांनी मांडले या कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवर व आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या