💥ग्राहकसेवा केंद्रांकडून बँक ग्राहकांकडून मनमानी सेवा दर आकारणी💥
जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सोबतच इतर सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्राहकांची बँकांत होणारी गर्दी कमी करण्यासाठी तसेच किरकोळ कामे बँकेबाहेर होण्यासाठी प्रत्येक गावात किओयस्क शाखा म्हणचेच छोटे वीस हजार रुपयांपर्यंत व्यवहार करण्यासाठी मोफत ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहेत, शिवाय काही खाजगी कंपनीचे सेवा केंद्र ही आहेत परंतु सध्या सुरू असलेल्या बहुतांश ग्राहक सेवा केंद्रांमध्ये सेवेच्या नावाखाली ग्राहकांची लुटमार चालू असल्याचे चित्र सर्वत्र दिसुन येत आहेत,जनधन योजनेच्या अंतर्गत सर्वच नागरिकांचे आता खाते उघडले गेल्या असुन छोटे शेतकरी,कामगार,रोजंदारीवर मजुर इत्यादिसह अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या ग्राहकांची भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे वेगवेगळ्या योजनांचे अनुदान व बचत इत्यादी पदरचे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर या ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्राचा रस्ता दाखवत आहेत परंतु सेवा केंद्रे मात्र पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडुन बेकायदेशीर पणे पैसे घेत आहेत, या प्रकारे सेवा केंद्र चालक महिन्याकाठी बेकायदेशीरपणे लाखो रुपये पदरी पाडत आहेत.आमच्या प्रतिनिधीने जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अश्या पद्धतीने सेवा केंद्रांनी पैसे घेणे बेकायदेशीर असल्याचे असे ते म्हणाले, तसेच अशी मागणी केल्यास त्यांना पावती मागा न दिल्यास सेवा केंद्राच्या विरुद्ध संबधित बँकेत तक्रार दाखल करून त्याची प्रत आम्हाला पाठवावी.
एटीएम/जिसीसी तथा आधार नंबर ने पैसे काढताना सध्याचे दरपत्रक...
रक्कम। बेकायदेशीर रक्कम
रु.1000 रु20
रु 5000 रु50
रु10,000 रु 200
रु.20,000 रु500
पासबुक प्रिंट 10 रु प्रति पेज
- होम ब्राँच असल्यास कोणतेही शुल्क लागत नाही व काही सेवा ज्या सशुल्क आहेत त्यांची पावती आम्ही ग्राहकांना देतो.
- एक सेवा केंद्रचालक
ग्राहक सेवा केंद्रचालकांनी मनमानी लुटमार सुरू केल्याने बँकेतील गर्दी कमी होण्याची व अधिक सेवा लवकर मिळण्याच्या मोहिमेला खीळ बसत आहे.
- बँक ग्राहक
0 टिप्पण्या