💥येत्या दोन दिवसांत ताडकळस येथील सर्वोतोपरी प्रश्न सोडविण्याचे उपविभागीय अभियंता नाईक यांनी दिले आश्वासन💥
✍️लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी)
पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ताडकळस येथील बाजारपेठेत परिसरातील ४० ते ५० गावांचा नेहमीच संपर्क असतो . त्याचबरोबर या ठिकाणी अनेक छोटे मोठे उद्योग धंद्ये देखील हे विजेवरच अवलंबून असल्याने अनेक व्यावसायिकांना अनंत अडचणीचा सामना करत मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे .
गत मागील दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना च्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहे काही दिवसांपूर्वीच शासनाकडून बाजारपेठ उघडण्यासाठी परवानगी मिळाली असताना ताडकळस ची ही बाजारपेठ उघडण्यात आली परंतु विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे येथील व्यावसायिकांचे , विद्यार्थ्यांचे व अनेक उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व्यवसायिकांचा देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो वीज वितरण विभागाकडे याविषयी येथील व्यापाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आणि पत्रकारांनी सुद्धा वारंवार याविषयी तक्रार देखील केली व त्याचबरोबर उपोषण देखील केले परंतु या तक्रारीचा व उपोषणाचा काहीच फायदा झाला नसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे .
या सर्व विषयांवर ताडकळस येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतिने बुधवार दिनांक २३ जून रोजी उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभागीय कार्यालय पूर्णा यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले या निवेदनात ताडकळस येथील ३३ के.व्हि. उपकेंद्रातून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो तसेच परिसरातील काही रोहित्र नादुरूस्त आहेत व कर्मचारी वर्गही अपुरा आहे या सह आदी समस्यांचा यात समाविष्ट करण्यात आला होता या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करणार असल्याचे उपविभागीय अभियंता नाईक यांनी ताडकळस येथील पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
यावेळी उपविभागीय कार्यकारी अभियंता नाईक व जेई गुंजोटी यांना निवेदन देताना ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,ज्येष्ठ पत्रकार मदनराव अंबोरे ,पत्रकार देवानंद नावकीकर ,बाळासाहेब राऊत ,सचिन सोनकांबळे ,शमीम पठाण ,गजानन नाईकवाडे यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते....
0 टिप्पण्या