💥उपजिल्हाप्रमुख मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने तहसीलदार यांना दिले निवेदन💥
गंगाखेड (दि.१६ जुन २०२१) - गेल्या दहा वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम चालू आहे अद्याप पर्यंत काम पूर्ण न झाल्यामुळे वळण रस्ता काढून दिलेला आहे ,परंतु या वळण रस्त्यावर खड्डेच खड्डे होऊन अनेक अपघात घडत आहेत यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. यासाठी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन रास्त रोको ढोल वाजवून रस्ता रोक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येथील बस स्थानक जवळ उड्डाणपूल चे काम गेल्या दहा वर्षापासून चालू आहे परंतु अद्यापही काम पुर्ण न झाल्यामुळे रहदारीसाठी वळण रस्ता काढून दिला आहे; परंतु या वळण रस्त्यावर पावसामुळे 2/2 फूट खड्डे होऊन चिखल झालेला आहे, यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी सर्कस करावी लागत आहे.या खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झालेले आहेत. या रस्त्यावरून लोडिंग ट्रक, टँकर, टिप्परची देखील वाहतूक आहे. पादचारी नागरिकांना तर रस्त्यावरून जाणे ही मुश्कील झाले आहे. तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग सोंग घेऊन बघ्याची भूमिका घेत आहे यापूर्वी सा.बा. विभागाने वळण रस्त्यासाठी डांबरीकरण तीन वेळास थातूरमातूर कामे केले आहे आणि बिले उचलून फस्त केली आहे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने आज बुधवार दि.१६ जुन २०२१ रोजी तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की चार दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिनांक २१ जून २०२१ रोजी ढोल वाजवत रस्ता रोको करून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बेश्रमाचे झाडे लावून निषेध व्यक्त करणार आहे. यावेळी तहसीलदार यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून वळण रस्ता तात्काळ दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेशित केले. या निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, पंचायत समिती सदस्य माधवराव शेडगे, नगरसेवक बाळासाहेब राखे ,ज्येष्ठ शिवसैनिक बालासाहेब पारवे, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख भागवत शिंदे, उद्धव भोसले, स्वप्निल राठोड, अक्षय आंधळे, रामेश्वर भोळे, शुभम शिंदे, कृष्णा बेले, चंद्रकांत उजेड, अशोक बिडगर, सिद्धेश्वर आंधळे, संजय राठोड, संदीप मुंडे, बाबू नागरगोजे, गणेश राठोड असंख्य नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत....
0 टिप्पण्या