💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीची जलसंपदा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्याकडून दखल जलसंपदा सचिवांना कारवाईच्या सुचना💥
परभणी (दि.२१ जुन २०२१) - सद्यस्थितीमध्ये धरणात पाणी उपलब्ध असुनही पैठण डावा कालवा नादुरुस्त असल्याने पाणी पुर्ण क्षेमतने कालव्यामध्ये पोहचत नाही. कारण पैठण कालव्यामध्ये १२२ ते २०८ व शाखा कालवा ७० व इतर शाखा कलवा मध्ये बऱ्याच प्रमाणावर गाळ साचलेला असल्यामुळेच पुर्ण क्षमतेने सोडलेले पाणी देखील गाळामुळे कालव्यातुन व्यवस्थीत पुढे जात नाही. त्याच बरोबर संबंधीत कालव्यावर अनेक गेट नादुरुस्त आहेत. त्यामुळे देखील पाणी योग्य पध्दतीने वितरित न होणे व पाणी वाया जाणे अशा घटना घडत आहेत. त्या करता पैठण डाव्या कालव्याच्या गेट ची तत्काळ दुरुस्ती करणे व कालव्यातील गाळ काढणे खूप आवश्यक आहे.
जलसंपदा विभागा अंतर्गत येणाऱ्या यांत्रिकी मंडळ नांदेड यांच्या कडे कालव्याचे गेट निर्मिती व दुरुस्ती साठी ची संपूर्ण यंत्रणा, मनुषबळ व मशनरी उपलब्ध आहे केवळ काम नसल्यामुळे येथील करोडो रुपयांची मशनरी धूळखात पडून आहे तसेच येथील अधिकारी व कर्मचारी काम नसल्याने फुगटच्या पगारी हि घेत आहेत. त्या करिता यांत्रिकी मंडळ यांच्या मार्फत पैठण डाव्या कालव्यातील गाळ काम नसल्याने पडुन असलेल्या मशनरीद्वारे काढण्यात यावा तसेच यांत्रिकी कामामध्ये तरबेज असलेल्या यांत्रिकी मंडळ, नांदेड मार्फतच या कालव्या वरील नादुरुस्त गेट त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री मा.ना.बच्चूभाऊ कडू यांच्या कडे लेखी स्वरूपात केली होती.
जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या यांत्रिकी मंडळ, नांदेड मार्फत जर पैठण डाव्या कालव्या वरील गेट दुरुस्ती व कालव्यातील गाळ काढण्याचे काम केले तर गेट दुरुस्ती व गाळ काढण्यावर होणारा भरमसाठ खर्च वाचेल व यांत्रिकी मंडळ नांदेड येथे धूळखात पडलेल्या मशनरी, अधिकारी व कर्मचारी यांना काम मिळेल आणि अत्यल्प दरात हे काम पूर्ण होईल त्यामुळे शासनाचा पैसा वाचेल करिता मा.ना.बच्चूभाऊ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पैठण डाव्या कालव्या वरील गेट दुरुस्ती व कालव्यातील गाळ काढण्याचे काम यांत्रिकी मंडळ, नांदेड मार्फत तत्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात असे ही या निवेदनात म्हंटले होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू यांनी राज्याचे जलसंपदा विभागाचे सचिव यांना या मागणीवर वर तत्काळ कार्यवाही करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत....
0 टिप्पण्या