💥राज्यातील सत्ताधारी मंडळीना भेटून मराठी पत्रकार परीषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपूरावा💥
✍️ मोहन चौकेकर
मुंबई : पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून मान्यता देऊन आर्थिक मदत मिळावी व पत्रकाराच्या विवीध मागण्या साठी मराठी पत्रकार परीषदेचे पदाधीकारी राज्यभरात सत्ताधारी नेत्यांना भेटून मागणी लावून धरत आहेत. लवकरच मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांचे नेतृत्वा खाली राज्यभरात तीव्र अंदोलन उभारण्यात येणार आहे, या मागण्या मान्य झाल्या शिवाय स्वस्थ न बसण्याच इशारा देण्यात आला आहे. अशी माहीती राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना काळात पत्रकाराचे विवीध प्रश्न घेऊन मराठी पत्रकार परीषद सातत्याने संघर्ष करतआसून. मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त सर्व पत्रकार संघटनाना बरोबर घेऊन राज्यातील पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणूण मान्यता मिळवी , कोरोनने मयत 150 पत्रकारांच्या कुटुंबाला शासनाने आर्थीक मदत करावी आदी मागण्या प्राधान्याने मांडले जात आहेत. या साठी मुंबईत पत्रकार संघटनाना बरोबर घेऊन राज्यपाल भगतसिंग कोशारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली असून. या मागण्या लावून धरण्यात येणार आहेत या साठी या पुर्वी आत्मक्लेष अंदोलन, एस एम एस आंदोलन करण्यात आले. सातत्याने मागणी लावून धरली जात आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाध्यक्ष हरीश पटने यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांची भेट घेतली या मागण्या लावून धरल्या नांदेड जिल्हा पत्रकार संघाने परीषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांचे नेतृत्वा खाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्रकारचे शिष्टमंडळाने भेटून या मागण्या करण्यात आल्या यावेळी राज्याचे समाजकल्यान मंत्री धंनजय मुंडे उपस्थीत होते.यावेळी पत्रकारांच्या या मागण्या बरोबर छोट्या वॄतपत्रांचे शासनाकडे बाकी असणारे जाहीरात बीले तात्कळ काढण्याची मागणी लावून धरण्यात आली. हिंगोली येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांचे नेतृत्वा खालील शिष्टमंडळ भेटून या मागण्याचे निवेदन देण्यात आले. नाशीक येथे परीषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार यांचे नेतृत्वा खाली राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शिष्टमंडळ भेटले होते.राज्यात विवीध ठिकाणी हि मागणी लावून धरली जात आहे. पत्रकारांच्या या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठी पत्रकार परीषद मुख्य विश्वस्त एस एम देशमूख यांचे नेतृत्वा खाली सातत्याने पाठपूरावा करत असून विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे सरचिटणीस संजिव जोशी इतर पदाधीकारी सातत्याने हि मागणी शासनाकडे लावून धरत आहेत . शासनाने येणाऱ्या काळात तात्काळ पत्रकारांच्या मागण्याकडे गांभिर्याने लक्ष देऊन या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात तिंव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याच्या तयारी करण्यात येत आहे का अशी माहीती मराठी पत्रकार परीषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे द्वारे दिली आहे....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या