💥प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारंज्यात कोविड सेंटरचा आढावा घेण्याच्या निमित्ताने दौऱ्यावर आले होते💥
✍️फुलचंद भगत
कारंजा लाड -प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागल्यानंतर कांग्रेस चे आक्रामक व सक्षम नेते नाना पटोले ह्यांचे कारंजा लाड नगरीत प्रथमच आगमन होताच कारंजा लाड शहर काँग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया व कार्यकर्त्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नाना पटोले ह्याचा दौरा कारंज्यात कोविड सेंटर चा आढावा घेण्याच्या निमित्ताने असला तरी ह्या भेटी दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारंजा शहर व तालुक्यात कांग्रेस पक्ष बांधणीचे काम ही करतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्याप्रमाणे नाना पटोले ह्यांनी कारंजा लाड शहरातील कांग्रेस च्या जुन्या व एकनिष्ठ राहून पार्टीची सेवा केलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या ह्यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे सरचिटणीस अब्दुल राजिक शेख व वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे जिल्हा समन्वयक अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी नाना पाटोले यांच्या सोबत बोलताना सांगितले कि अरविंद लाठियां कारंजा लाड शहर काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष असतांना त्यांनी सर्व सामान्य जनतेला तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समर्थपणे कांग्रेस पक्ष चालवीला. शहरात कांग्रेस पार्टी ला सक्षम असे नेतृत्व दिले.पण कालांतराने लाठीयांच्या ध्यानीमनी नसतांना त्यांना विश्वासात न घेता त्यांचे कडुन अध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली ह्या सर्व प्रकाराने लाठीया जी चांगलेच अचंबित होऊन दुखावले गेले.आजही ती सल त्यांच्या व कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे चाहत्यांच्या मनात आहे .एवढा अवमान होऊन ही त्यांनी मात्र आजही कांग्रेस सोडली नाही कि विचारधारा सोडली नाही. पण ह्या प्रकारामुळे कार्यकर्त्यां मधील उत्साह कमी झाला असून त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. नगर परिषद कायद्याचा दांडगा अनुभव असणारा शहरात दुसरा नेता नाही.अश्या ह्या नेत्याला निश्चितच दुर्लक्षित करून चालणार नाही. नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची प्रक्रिया यापूर्वी च व्हायला पाहिजे होती परंतु वरिष्ठ पातळीवरून ह्याबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली आज पर्यंत झाल्या नाही. पाटोले ह्याकडे लक्ष केंद्रित करतील अशी आशा कार्यकर्त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी ह्यावेळी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की येत्या काही महिन्यांत नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकाच समाजाच्या भरोस्यावर अवलंबून राहुन निवडणूक जिंकण्याचा हा काळ राहिला नाही आहे.केवळ दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या समाजाचा व्यक्ती कारंज्यात आमदार म्हणून निवडून आला आहे.आजही आहे त्यामुळे सर्व जातीधर्माच्या समाजाला तसेच नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले तर कांग्रेस ला आगामी नगर परिषद निवडणूक कठिण जाणार नाही मात्र भविष्यात अशीच गटबाजी कायम राहीली तर मात्र विजयाच्या आसपास ही जाता येणार नाही. ह्याचा परिणाम म्हणून नगर परिषदेवर दुसऱ्या पक्षा चा झेंडा डोलाने फडकणार ह्यात शंका नाही. राज्यात सत्तांतर होत शिवसेना , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरकार आल्यानंतर कांग्रेस ला अच्छे दिन आल्याचे कुठे तरी जाणवत असतांनाच कारंजा लाड शहर मात्र ह्याला अपवाद असुन ह्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत नाना पटोले ह्यांचे जवळ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कारंज्यात नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ह्याचे प्रथमच आगमन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
ह्यावेळी अरविंद लाठीया , ज्योतीताई गणेशपुरे, अब्दुल राजिक शेख , अॅड संदेश जैन जिंतुरकर , फारुख अली , अॅड. सुभान खेतीवाले , लियाकत भाई मुन्नीवाले , जुम्मा भाई बंदुकवाले , तौसिफ खांन सरफराज खांन , रामबकस ढेंडूळे , प्रदीप वानखडे , उदयसिंह ठाकुर सर उपस्थित होते.
प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या