💥पालम येथे पत्रकार सुरक्षा समितीची बैठक संपन्न💥
पालम - (दि.21 जुन 2021) - पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार आंदोलन उपोषण निवेदन करत असून राज्यातील पत्रकारांच्या विषयावर सातत्याने शासन दरबारात प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या पत्रकार सुरक्षा समिती च्या परभणी जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी विनोद कांबळे यांची तर पालम तालुका शहराध्यक्ष पदी मा.अवधुत जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देऊन तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यांचासारख्या पत्रकार ची निवड झाल्याने सर्व जिल्ह्यांतील पत्रकारांकडून आनंद व्यक्त केला जात असून अनेक पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सचिव डॉ आशिषकुमार सुना कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे संघटक राजेश मापारा उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी कोकण विभाग अध्यक्ष प्रदीप रोकडे मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन जाधव उपाध्यक्ष नरेश जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे जालना जिल्हा अध्यक्ष गोपाळ त्रिवेदी उस्मानाबाद शहर अध्यक्ष शेहबाज शेख यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी पालम तालुकाध्यक्ष विलास वाघमारे,परभणी सु.स.सदस्य शशिकांत पौळ, गजानन भस्के सरपंच वाडी खुर्द,विशाल भोसले , दिलीप शिंदे, बाबुराव आवाड आदी उपस्थित होते सद्य परिस्थितीत पत्रकारांवर होणारे हलल्याचे प्रमाण वाढत आहे , त्यामुळे पत्रकारिता कशी करावी,पत्रकारांना होणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व पत्रकारांचे हक्क,प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमी तत्पर राहुन काम करनार आहोत असे मा.विनोद कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे...
0 टिप्पण्या