💥" शिवसैनिकांचे दोन प्रकार एक उभ्या काठीचा शिवसैनिक आणि दुसरा आडव्या काठीचा शिवसैनिक "💥
✍️लेखक: सतीश सातोनकर. "गोफणगुंडाकार"
भारतीय राजकारणा मध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला मित्र पक्ष म्हणजे शिवसेना हे त्रिकालाबाधित सत्य शिवसेनेच्या पाच पिढ्यांनी अनुभवले आहे आणि या पिढ्या याच युतीमध्ये मोठ्या झाल्या वाढल्या ग्रामीण व शहरी भागातून कष्टकरी कामगार व मध्यम वर्गातून नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावले त्यातले काहीजण आज राष्ट्रीय पातळीवरचे ज्येष्ठ नेते आहेत.
तर परम आदरणीय स्वर्गीय अटलजी ,श्री प्रमोद महाजन साहेब, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या सर्व महनीय नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे राष्ट्रीय दृष्टी... विशाल दृष्टी भारतीय जनता पार्टीच्या या सर्व नेत्यांचे आवडते आणि आदराचे स्थान होते ते म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब....89 90 चालू सभेपासून सुरू झालेला प्रवास 1995 ते 2005 असा भाजप-शिवसेना युती चा सुवर्णकाळ होता सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर हिंदुत्वाचा व्यासपीठावर एका विचाराने वज्रमुठ घेऊन एकत्रित येणारे नेते असा परिचय सर्वसामान्य माणसांमध्ये युतीच्या नेत्यांचा होता.
शिवसेना सत्तेच्या जवळ जाऊ लागले की शिवसेना फोडणे शिवसेना पक्ष छिन्नविछिन्न न करणे बंडखोरी करण्यास भाग पाडणे असे प्रकार नागपूर येथील अधिवेशनापासून भुजबळ साहेबांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या भांड्यातून सुरू झाल्या त्या सर्व गोष्टी युतीसाठी अत्यंत मारक होत्या तर सर्वांनी मिळून शिवसेनेला कोंडीत पकडून बंडखोरी माजवुन गाव पातळीवरील शाखेमधून शिवसेनेची असलेली विश्वास हरदास पूर्णपणे संपवायची असा तो कुटील दीर्घकालीन राजकीय कूटनीतीचा भाग होता.
परंतु वंदनीय शिवसेनाप्रमुखांची शिवसैनिकांच्या मनावर असलेली पकड व शिवसेनेची संपूर्ण संघटनात्मक शिदोरी म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांची वंदनीय शिवसेनाप्रमुखांवर असलेली असीम श्रद्धा यामुळे पहिल्या प्रयत्नात ज्यांना शिवसेना संपवता आले नाही त्यांनी मग वारंवार पक्षांमध्ये बंडखोरी मारून पक्ष संपवायचा प्रयत्न केला या सततच्या बंडखोरी मध्ये मराठवाड्यात परभणी जिल्हा सतत अग्रेसर राहिला खासदार साहेब आमदार साहेब पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले की पुन्हा शिवसैनिक नव्या दमाने नव्या नेतृत्वाला निवडून द्यायचा...
अशी एक दुष्ट चक्र ची मालिका शिवसेनेच्या नशिबी परभणी जिल्ह्यात आल्याचे मी डोळ्याने पाहिले आहे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातही थोड्याफार फरकाने परभणी पॅटर्न राबविण्यात त्याकाळचे काँग्रेस सरकार यशस्वी झाले होते हे सर्व घडत असताना शिवसेनेचे बलस्थान होते ते म्हणजे शिवसेनेची शाखा" सन्माननीय पक्षाचे खासदार असो की आमदार असो त्यांना जाब विचारण्याची ताकद वंदनीय शिवसेनाप्रमुख यांनी शिवसेनेच्या शाखेतील शिवसैनिकांना दिली होती.
त्यामुळे मी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना मी प्रश्न विचारू शकतो निवडून आलेला लोकप्रतिनिधी माझ्या पैकीच एक आहे तो माझा बांधव आहे असा दृढ विश्वास शिवसैनिकांमध्ये असायचा आणि शिवसेना निष्ठेने पुन्हा कामाला लागायचा अगदी चार आण्याचे पत्र जरी टाकली तरी मातोश्रीवर पोहोचून वंदनीय शिवसेनाप्रमुख त्याच्यावर यथोचित विलास करून त्याची दखल घेत व शिवसैनिक आला परत तिचे पत्र अथवा फोन करून त्याला विचारपूस करत जिल्हा शाखेतील जिल्हाप्रमुख त्या शाखेतील शिवसैनिक आंकडे जाऊन तुमचा प्रश्न काय आहे ते साहेबांना तुम्ही फोनवर बोला चला माझ्याबरोबर असे म्हणून तो वंदनीय शिवसेनाप्रमुखांची व त्या शिवसैनिकांची बोलणे करून देत असत.
भारतीय राजकारणामध्ये संघटनात्मक दृष्ट्या बऱ्याच राजकीय पक्षांनी प्रचंड कार्य केले असेल लाटा निर्माण केले असतील परंतु शिवसेनेने सारखे संघटनात्मक कार्य इतर पक्षांना जमले असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल कारण इतर पक्षांना सत्ता करण्यासाठी सहकार महर्षी ची गरज पडायची सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन ची गरज पडायची बँकांच्या चेअरमन ची गरज पडायची शिवसेनेकडे तसे काहीच नव्हते भारतीय जनता पार्टीची अवस्था ही त्याकाळी यापेक्षा काही वेगळी नव्हती शिवसेना-भाजपा युती न दिलेला उमेदवार आपल्यासारखाच सामान्य परिस्थिती आहे हा एकच समान धागा कार्यकर्त्यांमध्ये उपाशीपोटी काम करण्यास भाग पाडत या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे पक्ष कार्यामध्ये रस घेत होते साहेबांच्या सभेला महाराष्ट्रभर हजर राहून कार्यकर्त्याच्या मनाचा ठाव घेत होते.
महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये वंदनीय शिवसेनाप्रमुखांची सभा असली की त्याकाळी आदरणीय उद्धवजी कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखी चर्चा करायची हे आम्ही 1991च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिले आहे वंदनीय शिवसेनाप्रमुख यांचे जादुई व्यक्तिमत्त्व शिवसैनिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करायचे ते आजपर्यंत कायम आहे शिवसेना कदाचित जगातला पहिला पक्ष असेल की ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष घडवला त्याच्या बरोबर आपले आयुष्य घातले त्याने त्याला काही मिळून केना मिळून तो निस्वार्थपणे आजही शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत शिवसेनेला धनुष्यबाण रूपाने मतदान करत असतो.
महाराष्ट्रातील हजारो शिवसैनिकांच्या छातीवर हातावर मनगटावर तुम्हाला 200 मान कोरलेला व बंदरे शिवसेनाप्रमुखांचे चित्र शरीरावर गोंदलेले ध्येयवेडे शिवसैनिक तुम्हाला आजही महाराष्ट्रामध्ये दिसतील माझ्या" गोफणगुंडा" या पुस्तकामध्ये ग्रामीण भागातील शिवसेना व शिवसैनिक यांचे चित्रण सत्य स्वरूपात उभारण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये या सर्व गोष्टींचा उहापोह मी केलेला आहे वंदनीय शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना या दोन नावाने भारतीय समाजकारणाची व राजकारणाची दशा व दिशा बदलून टाकली लोकसभा व विधानसभेच्या उमेदवाराकडे उमेदवारीच्या अनामत रकमेची पैसे जमा करण्याइतपत ताकत नसताना समाजातील तळागाळातील घटकातील सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवार यात बहाल करण्यात आल्या वंदनीय शिवसेनाप्रमुख व शिवसेना या नावावर लोकांनी वर्गणी जमा करून विधानसभा व लोकसभेचे उमेदवार शिवसेनेला निवडून दिली हा इतिहास कोणीही विसरता कामा नये.
मी पाहतो शिवसेनेच्या विरोधात लिहीत असताना बरीच मंडळी प्रत्यक्ष राजकीय वनक्षेत्राचा शून्य अनुभव असताना सुद्धा आपल्या ब्लॉक मध्ये व यु ट्यूब वरती शिवसेनेची किती मोठी चूक झाली आणि शिवसेना कशी संपणार यावर तोंडाला फेस येईपर्यंत आणि त्यांच्या हातातील लेखणीला भोंड येईपर्यंत ते लिहीत असतात भारतीय राजकारणातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला सैनिक ही उपाधी मिळाली ते शिवसेनेमुळे होय वंदनीय शिवसेनाप्रमुख यांनी शिवसैनिकाला सैनिकी उपाधी दिली आणि येथेच निष्ठेने काम करायचे हे बाळकडू प्रत्येक सैनिकाला मिळाले सत्ता असो अथवा नसो सत्तेत सहभाग मिळो अथवा न मिळो उमेदवारी मिळो अथवा न मिळो मंत्रिपद मिळो अथवा न मिळो मी एक शिवसैनिक वंदनीय शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेचा एक साधा घटक म्हणून काम करणे हा बाळ कडू चा धडा गेलेला तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली....
" शिवसैनिकांचे दोन प्रकार एक उभ्या काठीचा शिवसैनिक आणि दुसरा आडव्या काठीचा शिवसैनिक आडव्या काठीच्या शिवसैनिकाची नोंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आहे उद्या काठी चा शिवसैनिक म्हणजे शिवसेनेची सत्ता आली की घरातल्या दांडू ला भगवा झेंडा लावायचा आणि रस्त्यावर बेफाम पळत सुटायचे आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणून मी शिवसैनिक म्हणून छाती बडवून घ्यायची अशा लोकांच्या गर्दीमुळे सत्तेची व लोकप्रियतेची सूज आल्यासारखे वाटते...1985 यावर्षी भाजप-शिवसेना सत्तेमध्ये महाराष्ट्रातील खाड्या पिल्यावर दैवत वाहतूक करणाऱ्या कमांडर गाडीच्या ड्रायव्हर
त्याच्या सहकारी कंडक्टरने ज्याला ग्रामीण भागामध्ये नळा असे म्हणतात... हे लोक त्यांच्या ऐवजी वाहतूक करणाऱ्या वाहनावर भगवा झेंडा लावत व पाठीमागे मुख्यमंत्री साहेबांची तस्वीर व पुढे वंदनीय शिवसेनाप्रमुख यांची तस्वीर व जय महाराष्ट्र असा नारा गाडीच्या मागच्या व अग्रभागी अगदी ठळकपणे दिसायचा.. अजय निष्ठावंत शिवसैनिकांना स्वतःच्या निष्ठेवर संशय घ्यावा इतके प्रामाणिकपणे हे लोक वागत गळ्यात भगवा रुमाल डोक्याला भगवी टोपी आली भगवा टिळा सत्ताबदल लिही की शिवसैनिक होणारी ही मंडळी शिवसेनेचे सत्ता गेली की वर्षानुवर्षे कुठे दिसतही नाहीत.
1985 भाजप-शिवसेना युती सत्तेमध्ये का आली नाही याचे विश्लेषण केले असता असे लक्षात आले की कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना व पोलिसांना सतत मारहाण केल्यामुळे युती बदनाम झाली जाणीवपूर्वक इतर पक्षातील लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक घोषित करून कायदा व सुव्यवस्था आपल्या हातात घेत शिवसेना-भाजपचे सरकार बदनाम केले उदाहरण छोटे जरी असले तरी महत्त्वाचे आहे.हा उभ्या-आडव्या काठीच्या शिवसैनिकांची छोटीशी गाथा आहे.त्याकाळी शिवसेना संघटना अत्यंत मजबूत स्थितीत होती व त्यासाठी त्यांच्याकडे शिवसेना संपर्क प्रमुख त्या-त्या जिल्ह्याचे वंदनीय शिवसेनाप्रमुख यांचे सरदार होते व मजबूत संघटनात्मक दशकात घडलेला शिवसैनिक त्यांचे खरे सैन्य होते.
त्यामुळे सत्ता असो अथवा नसो वंदनीय शिवसेनाप्रमुख हे शिवसैनिकांचे बलस्थान होते तर महाराष्ट्रातला अथांग शिवसैनिकांचा संघ वंदनीय शिवसेनाप्रमुख यांचे बलस्थान होते......प्रचंड संघर्षाला पर्याय आहे या शब्दाचा अर्थ म्हणजे शिवसेना लोहाराच्या गरम भात यामध्ये तयार झालेल्या पोलादी तलवारीचा अर्थ म्हणजे शिवसेना कडवट शिवसैनिक झाल्याशिवाय शिवसेनेची ताकद कळणारच नाही बाहेर बसून शिवसेना संपतो असे म्हणणारे कितीतरी नेते मी पस्तीस वर्षात पाहिले अशी कित्येक नेते आज दिसत नाहीत...परंतु शिवसेना मात्र कायम तशीच ठाम उभी आहे...आव्हानांचा पर्याय म्हणजे शिवसेना....सत्तेत असतानाही व सत्तेबाहेर असतानाही शिवसेनेला सतत अग्नी परीक्षेला समोर जावे लागले.
शिवसेनेला सोडून जाणाऱ्या प्रत्येक ने त्यांना असं वाटलं की आपण सोडून गेलो म्हणजे शिवसेना संपणार त्यांनी शिवसेना सोडली परंतु त्यांच्या तालुक्यातील जिल्ह्यातील मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांनी भगवा झेंडा तसाच फडकवत ठेवला आपल्या हातांमध्ये आणि एकच नारा दिला बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद....शिवसैनिकांची एक पीडित थकायला लागली की दुसरी पिढी भगवा हातात घेते असं करण्यासाठी त्यांना कुठला प्रशिक्षण मिळत नाही स्वतःहून तो शिवसैनिक घोषित करतो असे जगात दुसरे उदाहरण सापडणार नाही....
कोणी सन्मान करो की अपमान करो वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा भगवान सोडून न जाणारे लाखो कार्यकर्ते या महाराष्ट्रात आहेत आणि हेच बलस्थान आज आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे शिवसेनेच्या कडवट सिस्टीममध्ये शिवसेनेच्या संपर्क प्रमुख यांनी घडवलेली पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी पिढी शिवसेनेसाठी काहीही करायला तयार होती .आणि आजही आहे असे उदाहरण इतर पक्षात दिसणे दुर्मिळ आहे वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेमध्ये कडवट शिवसैनिक घडवण्याचे काम शिवसेनेच्या संपर्क प्रमुख या पदाने घडवले हे निर्विवाद सत्य प्रत्येकाला मान्य करावेच लागेल.
शिवसेनेचा एक काळ असा होता की संपर्कप्रमुख याचा अहवाल आल्याशिवाय शिवसेनेचे कोणतेच उमेदवारी कोणाला मिळतही नव्हती आणि मग संपर्कप्रमुख अहवालानंतर शाखाप्रमुख यांच्या मान्यतेशिवाय उमेदवारी मिळत नव्हती हेही मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे.शिवसेनेत न्याय मिळतो हे ज्या पिढ्यांनी अनुभवली ती पिढी आजही शिवसेनेबरोबर आहे.राजकारणामध्ये अपरिहार्यता हा भाग आज फार अवघड होऊन बसला आहे.सत्तेच्या स्पर्धेमध्ये नाही धावलं तर आपण या जगाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ ही भीती प्रत्येकालाच आहे प्रत्येक पक्षाला आहे.
संक्रमणाचे कितीतरी उन्हाळे-पावसाळे शिवसेनेने अत्यंत यशस्वीरीत्या पचवले आहेत हे शिवसेनेच्या टीकाकार महोदयांना मान्य करावेच लागेल स्पर्धेच्या युगामध्ये राजकीय पक्ष जर मतदारांच्या कलेप्रमाणे चालत नसतील त्यांच्या इच्छेला आकांक्षांना पुरत नसतील तर ते समजतात असा हा कालावधी आहे या कठीण प्रसंगी वंदनीय शिवसेनाप्रमुख यांचे चिरंजीव शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री महोदय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभावातील संयम हा भल्याभल्या राजकारण्यांना कोड्यात टाकणारा ठरला आहे.... प्रसंग कितीही बाका असो टीकाकार विरोधकांनी किती हल्ला करू देत परंतु आपण आपला संयम आणि संयमी तोल घडू द्यायचा नाही असे आढळ व्यक्तिमत्व म्हणून देशाच्या राजकीय पटलावर अत्यंत कसोटीच्या प्रसंगी आदरणीय श्री उद्धवजींचे राजकीय विरोधक अभ्यासक व राजकीय विद्वान व विश्लेषक अत्यंत बारकाईने विश्लेषण करत आहेत.
क्रमशः भाग पहिला.
लेखक: सतीश सातोनकर. "गोफणगुंडाकार" लेखक तथा राजकीय विश्लेषक. परभणी मराठवाडा. धन्यवाद भावनांचा स्वीकार व्हावा.
जय महाराष्ट्र...... अपूर्ण क्रमशः
0 टिप्पण्या