🌟परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची महाआघाडी उमेदवारांवर परखड टिका🌟
परभणी (दि.२० एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व जाती-पातीच्या,धर्माच्या नागरीकांनी आपणास प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे आपण या संधीचे निश्चितपणे सोने करु कधीही मतदाराची मतदारसंघाची प्रतारणा करणार नाही मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला आई शप्पथ सांगतो कधीही टक्केवारी खाणार नाही की कोणाच्याही जमीनी हडपणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शनिवार दि.२० एप्रिल रोजी निवडणूक प्रचारार्थ घेतलेल्या प्रचंड जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महायुतीतील सर्व घटक पक्षातील लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी विराजमान होते.महादेव जानकर यांनी आपल्या सडेतोड भाषणातून स्थानिक नेतृत्वासह विरोधकांवर कडाडून टिका केली. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळेच काळ्या आणि कसदार मातीचा हा परभणी जिल्हा विकासापासून वंचित राहीला परंतु या निवडणूकीच्या माध्यमातून सहनशील असणार्या मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवावे निश्चितच या मतदारसंघात विकासाची गंगा पोहचेल असा विश्वास व्यक्त केला.
परभणी जिल्ह्यात पुरेसा वीज पुरवठा नाही,पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी उपलब्ध नाही.उद्योगधंदे कोसोदूर आहेत. त्यामुळेच परिवर्तन गरजेचे आहे. परभणीकरांनो, तुम्ही साथ द्या आपण कापूस असो सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग आणू, कष्टर उभारु, वैद्यकीय महाविद्यालय सर्वार्थाने सक्षम बनवू, शैक्षणिक हब निर्माण करु, केवळ संधी द्या त्याचे निश्चित सोने करु, असा विश्वासही व्यक्त केला. आपणास घर दार नाही, आपण टक्केवारी खाणार्यांपैकी नाही किंवा जमीनी हडपणारेही नाहीत, आपण पूर्णतः परभणीकर होवू अन् या जिल्ह्यासाठी सर्वार्थाने स्वतःला वाहून घेवू, काळ्या आणि कसदार मातीस हिरवा शालू घालू, असा विश्वासही व्यक्त केला. या मतदारसंघातून रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ परप्रांतात स्थलांतरीत होत आहेत. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती केल्याशिवाय जिल्ह्यातून होणारे हे स्थलांतर थांबणार नाही, असेही स्पष्ट करीत जानकर यांनी आपण या जिल्ह्यात खेड्यापाड्यापर्यंत, वाडी तांड्यापर्यंत पोहोचत आहोत, सकाळी पाच वाजेपासून रात्री उशीरापर्यंत दौरे करीत आहोत, मतदारांच्या गाठीभेटी घेवून हितगुज करीत आहोत, आपणास निश्चितच यश मिळेल परंतु ते सर्वांच्या भक्कम सहकार्याने व आशिर्वादामुळेच असेल, असे ते म्हणाले.....
0 टिप्पण्या